आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
“लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण”, तुकोबांच्या या ओळींतून त्यांनी बालपणाचं मागणं देवाकडे मागितलं आहे. अगदी संतांनाही बालपण हवंहवंसं वाटत असेल तर तुमच्या-आमच्यासारख्या सामन्यांना ते हवंहवंसं का वाटणार नाही?
पण जगाच्या काही भागांमध्ये लहानग्यांचं बालपण हिसकावून घेतलं जातं. या आशयाच्या अनेक कथा आपण ऐकल्या आणि अनेक चित्रपटांमधून पाहिल्याही असतील. पण लहान मुलांना बळजबरीने सैन्यात भरती करण्यासाठी त्यांचं अपहरण केल्याचं तुम्ही ऐकलंय का? आफ्रिकेतील युगांडा देशात मात्र असा प्रकार ८० च्या दशकात सुरु होता. ते प्रकरण नेमकं काय होतं, याबद्दलच हा विशेष लेख..
१९८६ साली लहान मुलांना सैन्यात बळजबरीने भरती करून घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला. तेव्हापासून, ‘जोसेफ कॉनी’च्या नेतृत्वाखालील ‘लॉर्ड्स रेसिस्टन्स आर्मी’ने लहान मुलांना पकडायला आणि त्यांच्यावर अमानवीय अत्या*चार करायला सुरुवात केली. अत्या*चाराबरोबरच त्यांच्यावर केलेल्या प्रचंड बळजबरीमुळे ही लहान मुले सैनिक बनली. त्यांना संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी लढण्याची सक्ती केली गेली. अनेकदा या लहान मुलांना त्यांच्या कुटुंबाचीसुद्धा ह*त्या करायला प्रवृत्त केले जात असत.
लॉर्ड्स रेसिस्टन्स आर्मी ही एक क्रांतिकारी संघटना होती. याची स्थापना जॉन कॉनीने उत्तर युगांडामध्ये केली होती आणि लॉर्ड्स रेसिस्टन्स आर्मीचे मुख्य काम ‘अचोली’ समुदायाच्या हक्क आणि मागण्यांसाठी लढणे हे होते. या प्रकारामुळे जॉन कॉनीने मागच्या २४ वर्षांत मिळालेले समर्थन गमावले.
समर्थन गमावल्यामुळे त्याने द*ह*शतीची राजवट चालवणे, लहान मुलांचं अपहरण करून त्यांना सैन्यात सामील करणे, नागरिकांमध्ये हिं*साचार चालवणे या गोष्टी सुरु केल्या. या गटाला जबरदस्तीने देशाच्या बाहेर हाकलण्यात आले, त्यामुळे हा गट ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो’, ‘सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक’ आणि दक्षिण सुदान अशा विविध ठिकाणी देखील विखुरला.
हे सगळं १८२० साली, ‘हॉली स्पिरिट मुव्हमेन्ट’ पासून सुरु झालं होतं. या चळवळीचं नेतृत्व एलिस लेक्वाना यांनी केलं होतं. या चळवळीच्या माध्यमातून त्यांना ‘युगांडाचे सरकार’ पाडायचे होते. त्यांच्या मते, युगांडाचे सरकार ‘अचोली’ समुदायाच्या हक्कांचे उल्लंघन करीत होते. लेक्वाना आणि सरकारमधील सशस्त्र संघर्ष वाढत होता. त्यानन्तर काही दिवसांतच चळवळीच्या या नेत्याला देशाबाहेर काढण्यात आले. १९८६ साली जोसेफ कॉनीने चळवळ पुनरुज्जीवित केली आणि एक नवा गट स्थापन केला, त्याचं नाव लॉर्ड्स रेसिस्टन्स आर्मी.
कॉनीच्या म्हणण्यानुसार, त्याची ध्येये सध्याचे सरकार उलथवून टाकणे आणि युगांडाचा कारभार बायबलमधील टेन कमांडमेंट्सच्या आधारे चालवणे ही होती. त्याला त्याच्या गटाच्या सर्व सदस्यांकडून पाठिंबा मिळत नव्हता, म्हणून सैन्यातील रिक्त पदं भरण्यासाठी त्याने गावागावांतील लहान मुलांचे अपहरण करायला सुरुवात केली. हीच लहान मुले पुढे घातक सैनिक बनले.
बंडखोर लोक सैन्याचा वेष धारण करून गावांवर आणि एखाद्या कार्यक्रमासाठी जमलेल्या गावकऱ्यांवर ह*ल्ले करीत असत. त्यांनी अनेक गावांवर असे हिं*सक ह*ल्ले घडवून आणले. अशक्त आणि वयोवृद्ध लोकांना पकडून ते बंडखोर त्यांना सुरा, तलवारी किंवा दगडाने ठेचून मारून टाकत असत. इतरांना इशारा देण्यासाठी त्यांचे नाक, कान किंवा ओठ कापले जात. बंडखोर लोक उपयोगी लोकांना पकडत असत. विशेषतः लहान मुलांना.
पकडलेल्या कैद्यांना छावण्यांमध्ये नेले जात. तेथे त्यांना हिं*सक पद्धतींनी प्रशिक्षण दिले जात आणि त्यांचे रूपांतर सैनिक, कुली आणि सेक्स स्लेव्हज्, इत्यादींमध्ये होत असे. त्यांना अनेकदा त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांवर बला*त्कार करण्यास किंवा त्यांची ह*त्या करण्यास प्रवृत्त केले गेले, यामुळे त्यांना घरी परतणे अशक्य होऊन बसले. ज्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा मिळालेल्या आदेशांना विरोध केला त्यांना छळ करून ठा*र मारण्यात आले.
एकदा कॉनीच्या कॅम्पमध्ये आल्यानंतर, मुलांना बेशुद्ध होईपर्यंत बेदम मा*रहाण होत असे. ही मा*रहाण तेथे असलेली लहान मुलेच करीत असत. जर ते ओरडले तर त्यांना जीवे मारले जात. सुरुवातीला, त्यांना इतर सैनिकांबरोबर जेवण करण्याची परवानगी नव्हती. त्यांना अपवित्र आणि गलिच्छ मानले जात होते. काही दिवसांनी कमांडर त्यांना बोलवत असत. त्याठिकाणी एक विधी होत असे. एक प्रकारचे तेल पाण्यात मिसळून, त्याच्या साहाय्याने, क्रॉसचे चिन्ह त्यांच्या डोक्यावर, ओठांवर, हातांवर आणि हृदयाजवळ काढले जात.
या विधीनंतरच ते बाकीच्या सैनिकांसोबत जेवू शकत होते. लॉर्ड्स रेसिस्टन्स आर्मीशी संबंधित असलेल्या बाल सैनिकाच्या दैनंदिन जीवनात दुष्काळ, मा*रहाण, पॅट्रोलींग, हिं*सक छापे यांचा समावेश होता. “आ*क्र*मणादरम्यान एका माणसाला मरेपर्यंत प्रतिस्पर्ध्याचे हातपाय कापताना पाहिले होते”, असे बचावलेल्या बालसैनिकांपैकी एकाने सांगितले. त्यांचा सतत संघर्ष रोगाशीसुद्धा होता. ‘आपल्या कुटुंबाला परत भेटण्याची आशा आणि आठवण त्यांना आजारी पाडते’ अशी कल्पना त्यांच्या मनात टाकली गेली होती.
अपहरण झालेल्या मुलांना सैनिक बनवण्यासाठी, गटाच्या सदस्यांनी काही स्टेप्स फॉलो केल्या: पहिली म्हणजे मुले कधीही घरी परत येतील अशी कोणतीही आशा त्यांना सोडून द्यावी लागत असे. त्यानंतर विशिष्ट विधी आणि अंधश्रद्धेद्वारे, ते नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवतात आणि त्यांचे कौतुक करतात.
या सर्व स्टेप्सनंतर, त्यांच्यावर फक्त एकाच गोष्टीचे वर्चस्व असते ती गोष्ट म्हणजे राग. त्यांनी केलेली प्रत्येक कृती राग, मा*रहाण, उपासमार, त्यांनी पाहिलेले अ*त्याचार आणि केलेले गुन्हे या सगळ्यांनंतरही ते फक्त क्रोधाच्या आधाराने जिवंत राहिले. “मी जे काही पाहिलं ते मनापासून केलं नाही. तर माझे मन विनाशात गुंतले होते” असं एक वाचलेला पीडित मुलगा सांगतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.