आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात अनेक राजे महाराजे होऊन गेले. लोकशाही रुजण्यापूर्वी भारतात राजेशाही व्यवस्था अनादी कालापासून रुजलेली होती. अनेक राजांनी आपल्या विलासी आणि चैनी वृत्तीने राजगादी देखील गमावली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील भारतात काही प्रमाणात नावाला राजेशाही अस्तित्वात आहे. फक्त आता हे राजे महाराजे लोकशाही पद्धतीने निवडून येऊन देशाच्या कारभारात सहभागी होतात. लोकशाहीमुळे हे राजे महाराजे एका विशिष्ट भागातच मर्यादित राहिले आहेत.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर जगातील सर्वांत श्रीमंत लोकांचा सर्व्हे केला त्यावेळी हैद्राबादचा निजाम उस्मान अली खान हा जगातील सर्वांत श्रीमंत माणूस ठरला होता. त्याच्या श्रीमंतीबद्दल अनेक अख्यायिका सर्वत्र प्रसिद्ध होत्या. भारतातील राजे महाराजांचे असंख्य किस्से प्रसिद्ध आहेत. त्यावर चर्चा करायला सुरुवात केली तर कित्येक दिवस निघून जातील, पण हैद्राबादच्या निजामाचे किस्से मात्र आपण आता जाणून घेऊया. कारण भारतात राजेशाही का समाप्त झाली, हे समजून घेण्यासाठी या निजामाचे किस्से समजून घेणे फार महत्वाचे आहे.
भारतीय राजवाड्यात आजही आधुनिक रणनीतीचा वापर केला जातो.
आजही आपण ऐकतो की अमुक नेत्याकडे अमुक नेत्याच्या अनेक गोपनीय ‘सीडी’ कॅसेट वगैरे आहे. या सीडीच्या वारंवार उल्लेखाने नेते दबावतंत्राचा वापर करतात. ही गोपनीय माहिती प्रसिद्ध झाली तर सर्व कमावलेला मान सन्मान धुळीस मिळण्याची भीती असते.
भारताच्या राजकीय इतिहासात बाबू जगजीवन राम पंतप्रधान न होण्यास देखील एक सीडीच कारणीभूत ठरली होती. ब्लॅक मेलिंगची ही पद्धत जसे राजकारणी वापरतात तशी एकेकाळी राजे महाराजे वापरायचे.
भारताच्या स्वातंत्र्याचा व सत्तांतराचा इतिहास लिहिणारे डोमेनिक लॅपीएर आणि लॅरी कॉलिन्स यांनी आपल्या फ्रीडम ॲट मिडनाईट या ग्रंथात वर्णन आले आहे, “हैद्राबादच्या निजामाला न्यूड फोटोग्राफी आणि न्यूड पेंटिंगची प्रचंड आवड होती, त्याने आपल्या महालात हिंदुस्थानातील अशा असंख्य चित्रांचे संग्रहालय तयार केले होते.”
या पुस्तकात लेखक लिहितात की हे फोटो गोळा करण्यासाठी नवाबाने त्याच्या घरात ठिकठिकाणी गुप्त कॅमेरे बसवले होते, या कॅमेऱ्याने तो अनेकांचे गुप्त छायाचित्र काढत होता. त्याने बाथरूममध्ये देखील आरशात कॅमेरा बसवला होता, यातून तो लोकांचे नग्न अवस्थेतील फोटो काढून त्या संग्रहात ठेवायचा.
असं म्हणतात की नेत्यांचे असे स्निग्ध अवस्थेतील फोटो काढून ते जपून ठेवण्यात निजामाला वेगळा आनंद मिळत होता. बऱ्याचदा इतर राजांच्या प्रतिमेला डागळण्यासाठी तो हे फोटो वापरणार होता, असे म्हटले जाते.
हैद्राबादचे निजाम उस्मान अली खान हे शेवटचे निजाम होते. स्वातंत्र्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांचा परिवार पुढे तुर्कस्तानला निघून गेला. आजही हैद्राबादेतील काही लोक निजामाचे वंशज असल्याचा दावा करतात. नुकताच एका महिलेने ती निजामाची चौथी बायको असल्याचे म्हटले होते.
हैद्राबादचा शेवटचा निजाम हा एक अत्यंत अय्याश माणूस होता, त्याच्याच काळात हैद्राबाद संस्थांनात हिंदूंवर मोठे अ*त्याचार झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.