आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कुठल्याही देशासाठी त्याची सैन्य शक्ती फार महत्त्वाची असते. भारतासाठी भारतीय सैन्याचे तितकेच महत्त्व आहे. भारतीय सैन्याच्या उल्लेखानेच भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो. अत्यंत कठीण अशा परिस्थितीत देखील भारतीय सैन्य ज्या पद्धतीने शत्रूचा सामना करते व सीमांचे रक्षण करते हे निश्चितच अभिमानास्पद आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतरच नाहीतर भारत स्वतंत्र होण्याअगोदर देखील भारतीय सैन्याचे मोठे पराक्रम गाजवले होते. दुर्दैवाने ज्या प्रकारे स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय सैनिकांच्या पराक्रम गाथा लोकप्रिय आहेत, तशा स्वातंत्र्य मिळण्याअगोदरच्या यु*द्धातील पराक्रमकथा लोकांच्या परिचयाच्या नाहीत. दुसऱ्या महायु*द्धात भारतीय सैनिकांनी मोठा पराक्रम गाजवला होता.
या यु*द्धात याप्रेस येथे त्यांनी हि*टल*रच्या ना*झी जर्मनीच्या सैन्याशी यु*द्ध केले होते, या यु*द्धात अनेक भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ब्रिटिशांच्या बाजूने लढून देखील त्यांना यथोचित सन्मान मिळाला नव्हता.
ज्यावेळी भारतात स्वातंत्र्याचा यज्ञ सुरू झाला होता, त्यावेळी युरोपात पहिल्या महायु*द्धाचे बिगुल वाजले. जर्मनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बेल्जियमच्या याप्रेस या शहराचा ताबा मिळवला. जर्मनीच्या विरोधात ब्रिटिश सरकारला मोठ्या सैन्यदलाची आवश्यकता होती, तेव्हा ब्रिटिशांनी भारतात सैनिक भरती करण्यास सुरुवात केली.
अनेक भारतीय लोक ब्रिटिश सैन्यदलात भरती होऊ लागले. अनेक भारतीय या आशेने सहभागी झाले की यु*द्ध संपल्यावर ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देतील. त्यांना वाटत होते की त्यांचा यु*द्धातील सहभाग भविष्यातील स्वातंत्र्याची नांदी ठरणार आहे. भारतीय राष्ट्रीय सभेने देखील यासाठी मान्यता दिली होती. पण प्रत्यक्षात ब्रिटिशांचा या यु*द्धात दारुण पराभव झाला आणि असंख्य भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावले.
एका मोठ्या जहाजावर मोठ्या संख्येने भारतीय सैनिकांच्या तुकड्या यु*द्धभूमीच्या दिशेने रवाना झाल्या. या भारतीय सैन्याची हि*टल*रच्या ना*झी सैनिकांशी गाठ पडली, ती याप्रेस याठिकाणी!
याप्रेसमध्ये ऋण १० अंश सेल्सिअस इतके तापमान होते. अशा परिस्थितीत यु*द्ध करण्याचे कुठलेच वाजवी प्रशिक्षण नसणाऱ्या भारतीय सैनिकांना अत्यंत प्रशिक्षित व सुसज्ज अशा जर्मनीच्या सैन्याशी मुकाबला करायचा होता. जेव्हा प्रत्यक्ष यु*द्धाला सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला भारतीय सैन्याची स्थिती फार कमकुवत झाली होती, असं असलं तरीदेखील भारतीय सैन्य प्राण पणाला लावून यु*द्ध लढत होते.
एकीकडे जर्मनीसारखा बलाढ्य शत्रू होता तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या बाजूने यु*द्ध लढत होते त्यांची विश्वासघातकी वृत्ती होती. जर्मनीशी टक्कर घेणाऱ्या या भारतीय सैनिकांना साधा रसद पुरवठा देखील करण्यास ब्रिटिश तयार नव्हते. अशावेळी भारतीय सैनिक दुहेरी संकटात सापडले होते, असं असलं तरीदेखील त्यांनी हार मानली नव्हती.
सर्वकाही विपरीत असले तरी भारतीय सैनिक लढत होते. खरंतर जर्मनीशी भारताचे शत्रुत्व नव्हते, उलट ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वतःला बंधमुक्त करायचे होते. त्यासाठीच भारताचा खटाटोप सुरू होता. सैनिकांना विश्वास होता की त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र होईल.
भारतीय सैनिक प्राणपणाला लावून लढत होते. चारी बाजूंनी जर्मनीच्या सैनिकांचा वेढा पडला, तरीदेखील भारतीय सैन्य मागे हटत नाही, हे पाहून जर्मन अधिकाऱ्याने क्लोरीन गॅसचा वापर करण्याचे आदेश दिले. क्लोरीनच्या विषारी वायूसमोर भारतीय सैनिकांचा निभाव लागणार नाही, हे निश्चितच होते. असं असलं तरी देखील भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर ना*झी सैन्याला धूळ चाऱण्यात यश मिळवले. पण हे यु*द्ध जिंकताना क्लोरिनमुळे बहुतांश सैनिकांनी आपले प्राण गमावले.
हे महायु*द्ध संपल्यावर ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य नाहीच दिले ही गोष्ट वेगळी, पण मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना ९०००पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यापैकी १३ लोकांना तर ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या युद्धात वाचलेल्या ७० हजार सैनिकांना कायमचे अपंगत्व आले. या यु*द्धात ११ लाख भारतीय सैनिक लढत होते, त्यापैकी ६० हजार सैनिकांनी आपले प्राण गमावले होते.
इतके मोठे बलिदान दिल्यानंतर देखील ब्रिटिश सरकारने या सैनिकांना विशेष काही दिले नाही. भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिशांनी नकार दिला. या सैनिकांची भरती प्रामुख्याने ग्रामीण भागातून करण्यात आल्यामुळे त्यांच्याबद्दल कुठलाच रेकॉर्ड ब्रिटिश सरकारजवळ नव्हता.
हे सैनिक यु*द्ध लढत होते तेव्हा ब्रिटिशांनी काळे व गोरे अशी सैन्य विभागणी करून यांना यु*द्धभूमीवर रसद पुरवठा करताना कायम सापत्न वागणूक दिली. त्यांना कायम ब्रिटिश सैनिकांपेक्षा तुच्छ वागणूक मिळाली. एवढे लोक लढताना मृत्युमुखी पडले तरी देखील ब्रिटनला त्याचे कौतुक नव्हते ना दुःख होते. ब्रिटिशांचा या अमानवी कृतघ्नपणाचा इतिहास मात्र कधीच जगासमोर आला नाही.
ज्यांच्यासाठी हे सैनिक लढले त्या ब्रिटीशांनी जरी या बिचाऱ्यांना बाजूला सारले होते, तरी बेल्जियम ज्या देशातील याप्रेस येथे भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवला होता. तिथले नागरिक मात्र या सैनिकांच्या शौर्याप्रती कायम कृतज्ञ राहिले. मध्यंतरी जेव्हा बेल्जियन राष्ट्रप्रमुखांनी भारताला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी या सैनिकांचा बलिदानासाठी कृतज्ञता व्यक्त केली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.