The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘स्त्रीत्वाचाच’ त्याग करून, पुरुषाप्रमाणे राज्य करणारी ‘राणी रुद्रमादेवी’

by द पोस्टमन टीम
7 January 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारत एकमेव असा देश आहे जिथे देशाला ‘माता’ म्हणून संबोधले जाते. असा देश ज्याला हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे. जिथे ‘स्त्रीत्वाची‘ कधी लक्ष्मी, कधी सरस्वती तर कधी हातात खड्ग घेऊन रणांगणात शत्रूसं*हार करणारी काली माता, अशी विविध रूपे बघायला मिळतात.

अनेक शूर लढवय्यांनी या मातीत आपला पराक्राम गाजवला. याला स्त्रिया देखील अपवाद नाहीत. तान्ह्या बाळाला पाठीवर बांधून, ‘मेरी झांसी नाही दूंगी’ म्हणणारी राणी लक्ष्मीबाई, मुलगा आग्र्यात अडकून पडलेला असूनही स्वराज्य अखंड ठेवण्यासाठी स्वतः घोड्यावर स्वार होऊन, मोहिमेचं नेतृत्व करून खेळणा उर्फ विशाळगड ताब्यात घेणाऱ्या जिजाऊ, आपल्या विरुद्ध बंड करणाऱ्या आपल्याच सरदारांविरुद्ध उभी ठाकणारी रझिया सुलतान, दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाचं जिणं मुश्किल करणारी महाराणी ताराबाई, पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारी महाराणी आबाक्का किंवा ‘स्त्रीत्वाचाच‘ त्याग करून, पुरुषाप्रमाणे राज्य करणारी ‘राणी रुद्रमादेवी‘ ही अशी नावे आहेत जी काळसुद्धा पुसून काढू शकत नाही. त्यांपैकीच एक राणी रुद्रम्मादेवीचं चरित्र आपण थोडक्यात पाहूया.. 

रुद्रमादेवीचा जन्म काकतीय साम्राज्यात, राजा गणपतीदेव यांच्या पोटी झाला. राजा गणपतीदेव हे आपली राजधानी वारंगळ (सध्याच्या तेलंगणा प्रांतातील) येथून राज्य करीत. रूद्रमा त्यांची एकुलती एक कन्या होती.

काकतीय साम्राज्य हे तेलंगाणात पसरले होते, तत्कालीन ‘ओरुगलु’ (सध्याचे वारंगळ) ही त्याची राजधानी होती.

काकतीय राजांनी तेलुगू राष्ट्रावर इसवीसन ११५० ते १३२३ राज्य केले. तेलंगणाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनशैली घडवण्यात काकतीय साम्राज्याचा मोठा वाटा आहे. काकतीय साम्राज्याला वारस नसल्या कारणाने, हितशत्रुपासून बचाव करण्याच्या हेतूने, राजा गणपतीदेव यांनी रुद्रमादेवीला ‘राजा रूद्रदेव‘ म्हणून जगासमोर आणले व तिची मुलगी असल्याची ओळख गुप्त ठेवली.



एखाद्या राजपुत्राप्रमाणेच रूद्रमादेवी अस्त शस्त्र, तत्वज्ञान, वेदशास्त्र यात अतिशय पारंगत होती. किशोर वयातच रूद्रमाला, रुद्रदेव म्हणून सिंहस्थ व्हावे लागले. दिलेली जबाबदारी अतिशय परखड पणे पार पाडत, न्याय करतना निष्पक्ष, दंड देतांना कठोर, व रयतेसाठी अतिशय मायाळू राणी म्हणून रुद्रमा झळाळली.

पुढे, निदाडवोलुचे राजपुत्र, ‘वीरभद्र’ यांच्याशी तिचा विवाह होऊन, त्यांना दोन मुली झाल्या.

पंड्याच्या आक्र*मणादरम्यान रूद्रमा वडिलांबरोबर राजकारभार सांभाळत होती. याच वेळी तिने काकतीय साम्राज्य दुर्बल होऊन, त्याची दुरावस्था झालेली पाहिली. जटावर्मन सुंदर पंड्या यांच्या विरुद्ध लढत असतांना मुटुक्कुर जवळील नेल्लोर येथे, राजा गणपतीदेव यांचा पराभव झाला. या लढाईत राज्याचे प्रचंड नुकसान झाले व राजा गणपतीदेव यांचा मान प्रजेत कमी होऊ लागला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

यु*द्धानंतर गणपतीदेवांनी समस्त कारभार रुद्रमादेवीच्या हाती देत, ते निवृत्त झाले. १२६१ सालापासून रुद्र्मादेवी राज्यकारभार  सांभाळू लागली. तिने ‘रेणाडु, ईरूवा मुलिकिणडु आणि सत्ती‘ नावाचे किल्ले काबीज करून, राज्याला सशक्त बनवले. सामान्य प्रजेतील लोकांना, लष्करात महत्वाचा हुद्दा देत, तिने प्रजेचा विश्वास व प्रेम संपादित केले.

एक स्त्री असल्यामुळे रुद्रम्माला सतत मंत्र्याकडून होणाऱ्या तिरस्काराला व द्वेषाला सामोरे जावे लगले. ‘कुठली ही स्त्री आम्हाला राज्यकर्ती म्हणून नको’ असं म्हणून हरिहर देव आणि मुरारी देव, या तिच्या चुलत्यांनीच तिच्या विरुध्द बंड पुकारलं, पण डळमळीत न होता, रुद्रमांनी तो बंड मोडीत काढत, पुन्हा आपली पात्रता सिद्ध केली. देवगिरीच्या यादवांना हरवून, त्यांच्याशी तह करून, तिने शांतिप्रस्ताव मंजूर करून घेतला, व राज्याची सुख, शांति अबाधित ठेवली.

या सुमारास वडील गणपतीदेव व पती वीरभद्र यांना लागोपाठ देवाज्ञा झाली व रुद्रमांनी आपली अत्यंत जवळची व महत्त्वाची माणसे कायमची गमावली. पण कर्तव्यपूर्तीसाठी तिने स्वतःला सावरले व १२६९ साली तिचा यथासांग राज्याभिषेक करण्यात आला आणि रूद्रमादेवीची ‘राणी रूद्रमादेवी‘ झाली.

एक थोर वीरांगना म्हणून रुद्रमादेवींचे नाव इतिहासात अजरामर झाले. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मुंजे, मुसोलिनी आणि रा.स्व.संघ…

Next Post

तुर्की कॉफीमुळे एका साम्राज्याचा अस्त होऊन एक स्वतंत्र देश अस्तित्वात आला होता !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

तुर्की कॉफीमुळे एका साम्राज्याचा अस्त होऊन एक स्वतंत्र देश अस्तित्वात आला होता !

या कीटकांनी आता उत्क्रांतीच्या रेट्यात थेट कीटकनाशकांना ठेंगा दाखवणं शिकून घेतलंय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.