आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
आज अगणित टीव्ही चॅनेल्स, नेटफलिक्स, अमेझॉन प्राईम, युट्युब असे अनेक मनोरंजनाचे साधनं उपलब्ध आहेत. परंतु ८० आणि ९०च्या दशकात टीव्ही म्हणजे दूरदर्शन. आठवड्यातून एकदा चित्रपट बघण्यासाठी एकाच्या घरी जमणे, गाणे बघण्यासाठी चित्रहार, कळत नसले तरी कृषीदर्शन असे कितीतरी कार्यक्रम आहेत जे तुम्हाला त्या जुन्या दिवसांची आठवण करून देतात. आज इतक्या सीरिअल्स आहेत, इतके चॅनेल्स आहेत पण कोणालाच दूरदर्शन सर येणार नाही.
आम्ही तुम्हाला त्या सिरीयल तर दाखवू शकत नाही पण ही यादी तुमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देईल यात शंका नाही.
१. ब्योमकेश बक्षी-
भारतीय शरलॉक होम्स. शरदींदू बंडोपाध्याय लिखित कादंबरीवर आधारित ही मालिका. ज्यामध्ये रजित कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. प्रत्येक तपशीलकडे लक्ष देऊन चांगले रचले गेलेले भाग यास पहाण्यासाठी ट्रीट बनवतात.
२. देख भाई देख-
संपूर्ण कौटुंबिक नाटक/विनोदी कार्यक्रम जो आपल्या चेहऱ्यावरील हसू कायम राहील याची हमी घेतो. दिवाण कुटुंब खरोखर दीवानी होते.
३. मालगुडी डेस-
९० च्या दशकातील एखादीच व्यक्ती असेल जिला ही सीरिअल आठवत नाही. आर. के. नारायण यांच्या पुस्तकावर आधारित, मालगूडीच्या काल्पनिक गावात सेट केलेल्या या मालिकेत भारतीय जीवनाच्या विविध पैलूंचे अचूक वर्णन केले गेले होते.
४. फौजी-
उत्कृष्ट अभिनय, लिखाण आणि दिग्दर्शन यांचा नमुना म्हणजे फौजी. अभिमन्यू रायच्या भूमिकेतील शाहरुख खान आजही लोकांच्या मनात घर करुन आहे.
५. हम लोग-
सुरुवातीपासूनच प्रचंड हिट झालेली ह्या सीरिअलचे जवळजवळ १५६ भाग दाखवले गेले होते. जे त्या काळातील सीरिअल्सची लांबी बघता ऐतिहासिकच मानले गेले पाहिजे.
६. उडान-
कविता चौधरी दिग्दर्शित आयपीएस अधिकारी होण्यासाठी सर्व बाबी व त्रास सहन करणार्या महिलेची कहाणी. आजही प्रासंगिक असणारी ही सीरिअल आठवली नाही तर नवलच.
७. बुनियाद-
या सीरिअलमध्ये भारताच्या फाळणीनंतर आणि त्यातील दुष्परिणामांनंतर सामान्य माणसाचे जीवन कसे दाखवले गेले होते. बुनियाद ही एक प्रचंड लोकप्रिय मालिका बनली होती. प्रमुख भूमिकेमध्ये आलोक नाथ तर दिलीप ताहिल, गोगा कपूर आणि सोनी रझदान हे देखील यात बघायला मिळतील.
८. भारत-एक खोज-
श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाने केवळ ५३ एपिसोडच्या मालिकेतून भारताचा इतिहास आपल्यासमोर आणला. ज्यात जातीच्या निर्मितीची, रामायण, सम्राट अशोका, कालिदास, अकबर – द ग्रेट आणि इतर बर्याच गोष्टींचा समावेश होता.
९. सुरभी-
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रम, इतिहासाचा धडा असो किंवा प्रवासी कथा, या शोमध्ये हे सर्व होते. आपण कधीही रेणुका शहाणे यांच्या त्या स्मितहास्याला कधी विसरू शकाल का?
१०. शक्तिमान-
प्रत्येक मनाच्या मनात घर केलेली ही सीरिअल. जेव्हा इतर टीव्ही वाहिन्यांनी भारतीय बाजारात जोरदार हल्ला केला तेव्हा शक्तीमान सुरू झाला. पण त्याने कमावलेली लोकप्रियता आजही तशीच कायम आहे
सॉरी, शक्तिमान!
याव्यतिरिक्त आंखे, आपबिती, रामायण-महाभारत, सर्कस, विक्रम-बेताल, तहकिकात, रजनी अशा अनेक सीरिअल आहेत ज्या आजही रसिकांच्या मनात घर करुन बसल्या आहेत. आजच्या कधीही न संपणाऱ्या सासू-सुनांच्या भांडणापेक्षा दूरदर्शनच्या या सिरिअल्स पुन्हा बघायला नक्कीच आवडतील यात शंकाच नाही!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.