आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
यु*द्धात नुसतेच शत्रूचे सैनिक कसे मारायचे याकडे लक्ष देऊन चालत नाही तर आपले सैनिक आणि आपला गोळाबारूद यांचे कमीतकमी नुकसान होईल याकडेही लक्ष द्यावे लागते. दुसऱ्या महायु*द्धात जर्मन सैन्याच्या हवाई दलाकडून होणारा मारा चुकवण्यासाठी मित्रराष्ट्रे कसोशीने प्रयत्न करत होते. त्याच्या हवाई शस्त्रांचाही ह*ल्ल्यासाठी वापर करत होते. परंतु, मित्रराष्ट्रांची विमाने क्वचितच सुखरूप परत येत असत. परत आली तरी ती पूर्णतः खराब अवस्थेत असायची.
विमाने एकतर समुद्रात कोसळत होती किंवा शत्रूच्या प्रदेशात. शत्रूच्या प्रदेशात कोसळणारी विमाने, त्यातील दारुगोळा आणि सैनिकही शत्रू राष्ट्रांचेच होऊन जात. हवाई शस्त्रांना आणखी मजबूत कसे करावे यावर संशोधन सुरु होते. मात्र त्वरित कामी येईल असा एकही उपाय यावर सापडत नव्हता.
आपल्या विमानांना आणि वैमानिकांना कसे वाचवावे असा प्रश्न सर्वांसमोर होता. अनेक तज्ञ याचंच उत्तर शोधत होते. आपल्या रणनीतीत, शस्त्रात किंवा विमानात, नेमका कशात बदल केला तर हा प्रश्न सुटेल हे कळत नव्हते. जितक्या लवकर हा प्रश्न सुटणार होता तितक्या सैनिकांचा प्राण वाचणार होता. अशा वेळी मित्रराष्ट्रांच्या उपयोगी पडला एक जर्मन ज्यू. जो ना*झीच्या छळाला कंटाळून ऑस्ट्रियातून अमेरिकेत आला होता. त्या व्यक्तीचे नाव होते अब्राहम वॉल्ड.
कार्ल मेंगर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केलेले अब्राहम वॉल्ड हे एक सांख्यिकी तज्ञ होते. आईनस्टाईनप्रमाणेच यांनाही ना*झीवादाचा बिमोड करायचा होता आणि त्यासाठीच ते मित्रराष्ट्रांना मदत करायला तयार झाले.
आजपर्यंत शत्रूराष्ट्रातून माघारी आलेल्या विमानांचा अभ्यास करून तयार करण्यात आलेले कित्येक अहवाल त्यांच्या टेबलावर पडले होते. त्यांनी त्यातील प्रत्येक अहवाल वाचला. पण, यात कुठेच त्यांना नेमका दोष दिसत नव्हता. शत्रू राष्ट्रात गेल्यानंतर ही विमाने त्यांच्या ह*ल्ल्यापुढे का टिकू शकत नाहीत? याचे कोडे काही उलगडत नव्हते. अब्राहम वॉल्ड यांच्यासमोर सर्व नेत्यांनी एकच समस्या मांडली होती. ह*ल्ल्यापासून वाचण्यासाठी आम्ही B17चे सुरक्षा कवच कसे मजबूत करू शकतो?
काही लोकांचे मत होते की विमानात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त दारुगोळा किंवा शस्त्रास्त्रे लादणेही चुकीचे आहे. या विमानांतून बॉ*म्ब, स्फो*टके नेता आली पाहिजेत. त्यांच्यात मोठ्या पल्ल्यावर मारा करण्याची क्षमता असली पाहिजे आणि तरीही ही व्यवस्थितरित्या हाताळता आली पाहिजेत.
वॉल्ड यांनी मिशनवरून परत आलेल्या विमानांचा डाटा मागवला. या सगळ्या विमानांवर गोळ्यांचा मारा केलेल्या खुणा होत्या. या विमानांची दुरुस्ती करण्याआधी ते कुठल्या अवस्थेत असतील त्याचाही एक डाटा मागवला. वॉल्ड यांच्या डेस्कवर नुसता अहवालांचा ढीग लागला होता.
लष्करातील इंजिनियर्सच्या मते, जिथे जिथे गोळ्या लागलेल्या खुणा दिसत आहेत विमानाची ती बाजू जास्त सुरक्षित कशी राहील हे पाहू. या गोळ्यांमुळे विमानाचे फार नुकसान होणार नाही अशा धातूचा वापर करू.
परंतु वॉल्ड यांनी जेंव्हा सगळा डाटा अभ्यासला तेंव्हा ते म्हणाले, “या विमानावर काही छिद्र किंवा गोळ्यांचा मारा केलेल्या खुणा दिसत नाहीत, त्या नेमक्या कुठे असतील?”
वॉल्ड यांच्या या प्रश्नाने सगळेच गोंधळून गेले. पण, त्यांच्या प्रश्नाचा रोख मात्र कुणालाच समजला नाही. त्यांच्या मते परत आलेल्या विमानाच्या इंधन टाकीवर आणि पायलट पिटवर गोळ्या लागल्याच्या किंवा मारा केल्याच्या खुणा नाहीत. परंतु जी विमाने परत आली नाहीत कदाचित त्यांच्या इंधन टाकीवर आणि पायलट पिटवर मारा झाल्या असण्याची शक्यता आहे. म्हणून विमानाच्या या दोन भागांना अधिक सुरक्षित कसे करता येईल हे पहिले पाहिजे. वॉल्ड यांचा समस्येकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा होता.
वॉल्ड यांच्या सल्ल्यानुसार जेंव्हा विमानांच्या या दोन भागात बदल करण्यात आले तेव्हा खरोखरच सैनिकांची होणारी प्राणहानी टळली होती. ही विमाने जेव्हा शत्रू प्रदेशातून सुखरूप परत येत तेव्हा विमानाच्या याच भागांवर अधिक गोळ्यांचा मारा झाल्याच्या खुणा दिसत असत. वॉल्ड यांच्यामुळे या यु*द्धातील कितीतरी मोठी प्राणहानी टळली आणि सैनिक आपल्या घरी सुखरूप परतू शकले होते.
अब्राहम वॉल्ड हे कोलंबिया विद्यापीठाच्या लष्कर विभागासाठी काम करत होते. ते अमेरिकेच्या लष्कराला मदत करत होते तरीही फक्त ते विदेशी असल्याच्या कारणाने त्यांच्यापासून लष्करी डाटा लपवून ठेवला जात होता. कोलंबिया विद्यापीठात यावरून एक विनोदही केला जात असे.
वॉल्ड यांनी डाटा वाचून अहवाल लिहीला की लगेचच लष्करातील अधिकारी तो त्यांच्या हातातून हिसकावून घेत का तर त्यांनी लिहिलेला अहवाल त्यांनीच वाचू नये.
अब्राहम वॉल्ड यांनी गणिती आणि सांख्यिकीच्या क्षेत्रात बरेच योगदान दिले. दोस्त राष्ट्रांना मदत करण्यात ना*झींचा बिमोड व्हावा हीच प्रेरणा होती.
खरंतर, आपल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी मित्रराष्ट्रांना ना*झींचा पराभव करण्यात मदतच केली होते. पण, तरीही मित्रराष्ट्रांना त्यांच्यावर विश्वास नव्हता. लष्कराची कोणतीही गोपनीय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली जायची. आणि त्याच लष्कराचे नुकसान कसे टाळावे याबद्दलचे सल्ले देखील त्याच्याकडूनच घेतले जायचे.
अब्राहम वॉल्ड यांनी विमाने कशी परत येतील याबद्दलची क्लृप्ती अमेरिकन सैन्याला दिली. पण दुर्दैवाची बाब म्हणजे यु*द्ध संपल्यावर पाच वर्षांनी म्हणजे १३ डिसेंबर १९५० रोजी त्यांचाच मृत्यू एका विमान अपघातात झाला.
या काळात वॉल्ड यांनी जे शोधनिबंध सदर केले त्यांचा वापर करूनच आजही लष्करी धोरणे ठरवली जातात. संख्याशास्त्रातील संशोधनाला त्यांनी एक वेगळी दिशा दिली.
दोस्त राष्ट्रांचा या यु*द्धात विजय झाला. कारण त्यांनी एक असा माणूस शोधला होता ज्याला, समस्येचे समाधान शोधण्यासाठी मुलभूत प्रश्न कसा विचारायचा हे माहिती होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.