The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दूरदर्शनच्या प्रतिमा पुरी या पहिल्या भारतीय वृत्तनिवेदिका होत्या

by द पोस्टमन टीम
16 December 2025
in ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


दुरचित्रवाणीचा शोध म्हणजे मानवी इतिहासातील महान शोधांपैकी एक. मनुष्याने केलेल्या प्रगतीतील सगळ्यात महत्त्वाचं पान म्हणजे दूरचित्रवाणीचा शोध म्हटलं तरी चालेल. याच दूरचित्रवाणीचे प्रदर्शन भारतात पहिल्या वेळेस जानेवारी ०६, १९५० ला मद्रास (आताचे चेन्नई) येथे भरवले गेले होते.

“माझ्या माहितीनुसार हे मद्रास मधील पहिले अशाप्रकारचे प्रदर्शन आहे. पुर्ण उपकरण हे अतिशय मजबूत आणि छोट्या छोट्या साधनांपासुन बनवले गेले आहे. श्री. बी. सिवकुमारन, जे विद्युत अभियंते आहेत, त्यांना या त्यांच्या अविष्कारासाठी खुप खुप शुभेच्छा द्यायला हव्यात.”

इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार असलेले टी. एन. शेषन यांचे हे वक्तव्य होते मद्रासमधील पहिल्या दूरचित्रवाणीच्या प्रदर्शनानंतरचे.

भारत त्यावेळी प्रजासत्ताक देशही नसताना पुढच्या ९ वर्षात भारताला स्वत:ची सार्वजनिक प्रसारण वाहिनी मिळाली. दुरदर्शन.

सप्टेंबर १५, १९५९ ला छोटेसे प्रेषकयंत्र, आणि एका कामचलाऊ स्टुडिओच्या सहाय्याने दुरदर्शन सुरु झाले. पहिले प्रायोगिक प्रक्षेपण सुरु झाले ते दिल्लीमधे.



पहिले प्रक्षेपण फक्त ५ मिनीटे चालले ज्यामध्ये बातम्या देण्यात आल्या होत्या. या बातम्या देण्यासाठी निवेदक म्हणून निवड केली गेली ती प्रतिमा पूरी यांची. प्रतिमा पूरी यांना निवेदक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवाजाची नैसर्गिक देणगी लाभली होती. ज्यामुळे त्यांची निवड खुप लवकर केली गेली. अशा या प्रतिमा पुरी भारताच्या पहिल्या दूरचित्रवाहीनी निवेदक बनल्या.

दिल्लीबरोबरच अजुन ६ शहरांमध्ये दुरचित्रवाणी सेवा सुरु होण्यासाठी १९७५ उजाडले. दुरदर्शन एकमेव प्रसारक त्यावेळी होते. दुरचित्रवाणी बघणाऱ्या लोकांची संख्या त्यावेळी खुप कमी होती. आणि प्रतिमाजींचा पटलावरील वावर खुप कमी होता.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

तरिही त्यांची साधी सरळ देहबोली, मधुर आवाज आणि वितरण पध्दत लोकांंना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आणि लवकरच त्या एक प्रसिध्द व्यक्तिमत्व बनल्या. देशाच्या दुरचित्रवाणीसाठी काम करताना त्यांनी अनेक मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. त्यामधे पहिला अवकाशात जाणारा मानव युरी गागरिन यांचासुध्दा समावेश होता.

दुरदर्शनने नंतर दैनिक प्रसारण चालू केले ते १९६५ मध्ये आणि ते अखिल भारतीय रेडिओचा एक भाग होते. सलमा सुलतान यांनी दुरदर्शन मधे नोकरी स्विकारली ती १९६७ मध्ये. लगेच त्यांनी प्रतिमाजींची निवेदकाची भुमिका स्वत:कडे घेतली.

काही दिवसानंतर पुरींची भुमिका बदलली तरीही त्यांनी दुरदर्शन बरोबरच काम चालू ठेवले. सुलतान यांच्या आवाजाच्या परिक्षणानंतर प्रसारकाला अजुन नविन निवेदक शोधण्याची गरज भासू लागली. त्यासाठी त्यांनी नविन निवेदकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु केले. या कामासाठी त्यांनी निवड केली ती पहिल्या भारतीय निवेदिकीची. प्रतिमा पुरी यांची.

प्रतिमा पुरी यांनी २००७ मध्ये जगाचा निरोप घेतला. भारतातील प्रत्येक स्त्री जिला आज त्यांच्या मार्गावर जायचे आहे, पत्रकार व्हायचे आहे त्या सगळ्यांसाठी त्या एक दिशादर्शक आहेत.

पहिल्या भारतीय निवेदिका म्हणुन आजही प्रतिमा पुरी यांना ओळखले जाते. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात आपल्या कर्तुत्वाने आपला ठसा भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिणाऱ्या प्रतिमाजी आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी एक प्रेरणास्थान ठरू शकतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या चौदा वर्षाच्या मुलाने चाचा नेहरूंचे प्राण वाचवले आणि ‘बाल शौर्य पुरस्कार’ सुरु झाला

Next Post

गुरु दत्त शेवटपर्यंत प्रेमासाठी ‘प्यासा’च राहिला

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
ब्लॉग

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

24 April 2026
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
Next Post

गुरु दत्त शेवटपर्यंत प्रेमासाठी 'प्यासा'च राहिला

आजचा भारत सर्व गुणदोषांसकट नरसिंहरावांचा भारत आहे, पण आपण त्यांना विसरलोय

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.