The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बलाढ्य इंग्रज सैन्याशी थेट सामना करणाऱ्या कित्तूर साम्राज्याच्या वीरांगनेची शौर्यकथा

by द पोस्टमन टीम
3 May 2025
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा देशावर बिकट प्रसंग ओढवले, तेव्हा एका स्त्रीने अनेक स्वरूपात देशासाठी बलिदान दिले आहे. कधी स्वराज्य जननी जिजाबाई म्हणून, तर कधी ताराराणी साहेब म्हणून, तर कधी राणी लक्ष्मीबाई तलवार हाती घेऊन रणांगण पेटवले, तर कधी बसंतीदेवी म्हणून स्वातंत्र्य लढ्यात जेल भरो आंदोलनातसुद्धा उतरली, तर कधी पंतप्रधान म्हणून देशाची राजकीय सूत्रं सांभाळली.

त्यांच्या पराक्रमाच्या व शौर्य कथांनी भारतीय इतिहास अधिक वैभवशाली झाला. असं म्हणतात ‘वूमेंम्स आर बॉर्न विथ एक्स्ट्रा च्रोमोसोम इन देअर डीएनए!

स्त्रियांनी असामान्य पराक्रम दाखवून देशाचं रक्षण केलं आहे व आजही आपल्या असामान्य कीर्तीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत .

‘जब बेटियाँ खडी होती हैं, तब विजय और भी बडी होती हैं, असं म्हणून १८५७ चा यशस्वी उठाव करणाऱ्या व आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या मणिकर्णिका आपल्याला माहिती आहेतच. त्यांच्या शौर्यकथा सदैव संपूर्ण देशाला प्रेरणा देतात.

 



women fighters the postman

पण १८५७ च्या उठावाआधी एका स्त्रीने उठाव केला जो भारताच्या इतिहासात थोडा दुर्लक्षित राहिला. १८२४ साली कित्तूरची राणी, राणी चेन्नम्मा यांनी ब्रिटिशांविरूद्ध उठाव केला होता.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

राणी चेन्नम्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ साली सध्याच्या कर्नाटकात झाला. बालवयातच खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांना तलवार चालवणं, घोडा चालवणं शिकवलं गेलं.

भातूकली खेळण्याच्या वयात त्या राजकारणाचे धडे गिरवू लागल्या. वयाच्या १५ व्या वर्षी कित्तूरचा राजा मल्लसराजा देसाई यांच्याशी विवाह झाला. दुर्दैवाने १९१६ साली राज्याचा मृत्यू झाला. त्यांचा एकुलता एक मुलगासुद्धा १९२४ साली मरण पावला.

राणी चेन्नम्मा सगळी दुःख मोठ्या धीरानं पचवत होत्या. कित्तूरचा राज्यकारभार पुढे नेण्यासाठी त्यांनी एक पुत्र दत्तक घेतला ज्याचं नाव ‘शिवलींगप्पा’ ठेवण्यात आलं.

याच काळात व्यापारी म्हणून आलेले ब्रिटीश भारतातील संस्थाने व राज्ये ताब्यात घेऊन आपलं साम्राज्य वाढवत होते. लॉर्ड डलहौसीने ‘डॉक्टरीन ऑफ लँप्स’ भारतावर लादला. या सिद्धांताअंतर्गत ज्या संस्थेला वारस नाही किंवा दत्तकपुत्र आहे, त्यांचा अधिकार ‘इस्ट इंडिया कंपनी’कडे असेल अशी घोषणा करण्यात आली.

अनेक संस्थानांनी ब्रिटिशांपुढे शरणागत पत्करली होती. थोड्याच काळात इंग्रजांची नजर कित्तूरकडे वळली. त्यांनी कित्तूरचे राज्य ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले. पण राणीने साफ नकार दिला. राणीच्या प्रखर विरोधामुळे व आक्र*मक पावित्र्यामुळे इंग्रजांनी कित्तूरवर पहिला ह*ल्ला केला.

इंग्रज जवळपास २००० सैन्य व प्रचंड मोठी ताकद घेऊन लढायला उतरले. कित्तूरचा खजिना लुटून त्यांना आर्थिकरित्या दुर्बळ बनवून राज्य ताब्यात घेता येईल या विचाराने ते यु*द्धात उतरले. पण राणीच्या शौर्यासमोर ते टिकू शकले नाहीत.

राणी चेनम्माने निकाराची लढत दिली. कित्तूरचा सेनापती व राणीचा विश्वासू अमातूर बाळप्पा यांनी मोठा पराक्रम गाजवत ब्रिटिश सैन्याचे मोठे नुकसान केले.

ब्रिटिशांचे दोन सैनिकसुद्धा त्यांनी यु*द्धबंदी म्हणून पकडले. अशा रीतीने कित्तूरचा विजय झाला व ब्रिटिशांना पराभव स्विकारावा लागला.

यु*द्धबंदी सोडवण्यासाठी ब्रिटिशांनी राणीकडे विनंती केली, तेव्हा राणीने एक अट घातली. कित्तूरचं साम्राज्य इस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन न करता, माझ्या मुलगा शिवलिंगप्पा राजा म्हणून राज्य करेल या अटीवर यु*द्धबंदींना सोडवण्यात आलं.

एका छोट्याश्या खेड्यातल्या सामान्य स्त्रीने आपला पराभव केला हा अपमान ब्रिटिशांना सहन झाला नाही, व त्यांनी पुन्हा यु*द्धाची तयारी सुरू केली, पण रणांगणावर आपण जिंकू शकत नाही हे त्यांच्या आधीच लक्षात आलं होतं.

त्यामुळे फितुरी करून राज्य बळकावण्याचा विचार ते करु लागले. कित्तूरच्या सैन्यातील दोन सैनिकांना त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलं. त्या दोघांनी बारूदात शेण व माती मिसळली. करार मोडून ब्रिटिश पुन्हा एकदा कित्तूरविरोधात रणांगणात उतरले. या वेळी देखील राणीने व सैन्याने निकाराची लढत दिली.

पण यावेळी मात्र फितुरीमुळे राणी पकडली गेली. राणीला बाइलहॉंगल किल्ल्यात अटक करण्यात आली व आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

सेनापती सांगोला रायअन्ना यांनी लढाई पुढे १९२९ पर्यंत सुरू ठेवली, पण दुर्दैवाने त्यांनासुद्धा अटक करून फासावर लटकवण्यात आले.

त्याच वर्षी २१ फेब्रुवारी रोजी राणीने आपला देह ठेवला. पुढे शिवलिंगप्पालासुद्धा अटक करण्यात आली व कित्तूरमध्ये कंपनीचे सरकार सुरु झाले.

भारताच्या इतिहासात असे अनेक प्रसंग काळाच्या पडण्याआळ दुर्लक्षित केले गेले. देशासाठी लढलेल्या अनेक वीरांची नावे अज्ञात आहेत. आपल्याला गरज आहे ती फक्त थोडे इतिहासाची पाने चाळून या वीरांना पुढच्या पीढ़ीपर्यंत पोचवण्याची.

त्यांचं रक्त या मातीत सांडल म्हणून हा स्वातंत्र्य रुपी वृक्षाचे फळ आपण चाखू शकतो. यात स्त्रियांचं योगदान कधीच दुर्लक्षित करता येणार नाही. कित्तूरची राणी चेन्नम्मा येणाऱ्या सर्व पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

त्यांना, त्यांच्या शौर्याला व पराक्रमाला विनम्र अभिवादन ….! !


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: British RajFreedom
ShareTweet
Previous Post

अशी ही बनवा बनवी: अजरामर कलाकृती एका वेगळ्या दृष्टिकोनातून

Next Post

आपल्या शौर्याने ब्रिटिशांना घाम फोडणारी, एक विस्मृतीत गेलेली वीरांगना

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

19 August 2024
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post
InUth

आपल्या शौर्याने ब्रिटिशांना घाम फोडणारी, एक विस्मृतीत गेलेली वीरांगना

विराटच्या आधी कॅप्टन टायगर पतौडींंनी बॉलीवूडमध्ये यशस्वी सोयरिक केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.