आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगामध्ये अंमली पदार्थाचा काळवंडलेला इतिहास मोठा आहे. अंमली व्यसनाधीनतेच्या पदार्थांमुळे मोठं नुकसान झाल्याचेही आपण बघितले. इतकंच काय या अंमली आणि व्यसनाधीन पदार्थांच्या विळख्यातून हिट*लरचीही सुटका झाली नाही. तसेच ‘नार्कोस’ नावाची पूर्ण चित्रपट मालिकाच अमली आणि व्यसनाधीन पदार्थांच्या व्यापारावर आधारित आहे. पाब्लो एस्कोबारने कशाप्रकारे प्रशासनाला वेड्यात काढलं आणि त्याच्या मृत्यूचं रहस्य बरेच दिवस गूढ होतं.
या अंमली पदार्थांनी जगभरात आपली जादू दाखवायला सुरुवात केली. अगदी हिट*लरपासून ते कॉलेजला जाणारे तरुणही ‘ड्र*ग्स’च्या आहारी जाऊ लागले. यावर उपाय म्हणून अनेक देशांनी आपापल्या कायद्यांमध्ये बदल करत अंमली पदार्थांच्या सेवनाला आणि प्रसाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणले. भारतामध्ये ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ नावाची तपास यंत्रणा पूर्णतः अंमली आणि व्यसनाधीनतेच्या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी तयार केली गेली आहे.
भारताप्रमाणेच जगभरातील देशांमध्ये असे कायदे आणि तपास यंत्रणा अंमली पदार्थांच्या प्रसाराविरुद्ध आणि सेवनाविरुद्ध कार्यरत आहेत. इंडोनेशियामध्येही अशा प्रकारच्या अंमली आणि व्यसनाधीनतेच्या पदार्थांवर सतत कारवाई सुरु असते. पण २०१५ साली इंडोनेशियाच्या पोलिसांकडून एक मोठी चूक झाली आणि शहरातील अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते.
इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून १५.५ मैल पश्चिमेला तंगेरंगच्या रहिवाशांनी गांजा आणि इतर अंमली पदार्थांच्या आगीतून बाहेर पडलेल्या धुराने ग्रासलेल्या वातावरणात श्वास घेतल्यानंतर डोकेदुखी आणि चक्कर आल्याचा अहवाल दिला. इंडोनेशियाच्या पल्मेरह पोलिसांनी पश्चिम जकार्ता येथील त्यांच्या उपशाखा कार्यालयात ३.३ टन गांजा आणि अंमली पदार्थांचा साठा चक्क उघड्यावर जाळला होता.
तंगेरंग पोलीस प्रमुख वरिष्ठ कमांडर रियाड यांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारी २०१५ रोजी दक्षिण तंगेरंगमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.
गांजा आणि अन्य अंमली पदार्थ पेटवताना काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मास्क घातले होते पण ते शहरवासीयांना सावध करायला विसरले. हा धूर त्यांच्यावर देखील परिणाम करू शकत होता. धोकादायक धूर उपशाखा कार्यालयाच्या अंगणातून आजूबाजूच्या रहिवाशांच्या घरात पसरला.
अनेक रहिवासी आणि जवळच उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी धूर रस्त्यावर पसरल्यानंतर चक्कर आल्याचे आणि नशा होत असल्याचे कळवले. ‘मला डोकेदुखीचा त्रास झाला, कारण मी मास्क घातला नव्हता’ असे एका रहिवाशाने सांगितले. एका पत्रकाराने तर या धुराचा सामना करण्यासाठी ‘बसा आणि एक कप चहा घ्या’ असे आवाहन केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सुमारे २ किलोग्रॅम क्रिस्टल मेथाम्फेटामाइन आणि २५३८ एक्स्टसी गोळ्या त्या आगीत नष्ट केल्या. बेकायदेशीर पदार्थांचा नाश पश्चिम जकार्ता नगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी पाहिला. सहसा ड्रग्ज तस्करांना इंडोनेशियात फाशीची शिक्षा देतात. पोलीस भाग्यवान होते असंच म्हणावं लागेल, कारण हा फक्त एक “अपघात” होता.
त्यामुळे हानिकारक मादक द्रव्यापासून मुक्त होण्याऐवजी पोलिसांनीच संपूर्ण शहराला एक रोमांचक वेळ दिला. अरेरे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.