The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या अशिक्षित साहित्यिकामुळे भोजपुरी भाषेला नवसंजीवनी मिळाली होती.

by द पोस्टमन टीम
17 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी बिहारच्या सारन जिल्ह्यातील एका साधारण कुटुंबात, ‘नाई’ परिवारात जन्म घेतलेल्या बालकाने काही काळातच भोजपुरी साहित्याला एक नवीन ओळख मिळवून दिली होती. आपण बोलतोय भोजपुरी भाषेचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाणाऱ्या ‘भिखारी ठाकूर’ यांच्याबद्दल. भोजपुरी या आपल्या बोलीभाषेत त्यांनी अनेक नाटके आणि कवितांची रचना केली होती.

भिखारी यांचा जन्म बिहारच्या सारन जिल्ह्यातील कुतुबपुर या छोट्याशा गावात झाला. लोकांच्या घरी आमंत्रण सांगण्याचे काम त्यांचा परिवार करायचा. पुरोहितांना पूजा अर्चना करण्यात मदत करण्यात देखील त्यांचा परिवार मदत करायचा. अत्यंत गरीब घरात जन्मल्यामुळे भिखारी यांच्यावर बालपणापासूनच या पारंपरिक व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली. अभ्यासात भिखारी यांचे मन अजिबात लागायचे नाही. याऐवजी नाचगाणे यातच त्यांना जास्त रस होता. ते आपल्या गाई चरायला घेऊन जायचे तेव्हा फावल्या वेळात त्यांना गायन आणि कविता करण्याची सवय लागली होती.

शेतात व माळरानावर त्यांच्या प्रतिभेला अंकुर फुटत होते. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी आपली पहिली भोजपुरी कविता लिहिली होती.

काही वर्षांत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी भिखारी ठाकूर बंगालच्या दिशेने रवाना झाले. बंगालमध्ये जाऊन केशकर्तनालय उघडण्याचा त्यांचा विचार होता, पण त्यांचे मन तिकडेदेखील रमले नाही. त्यांनी नाचगाण्याकडे आपला मोर्चा वळवला.

काही दिवसांनी ते बंगालच्या मेदिनापूर येथे ते गेले. याठिकाणी त्यांनी रामलीला मंचन नावाचा कार्यक्रम पाहिला. त्यांच्या मनात रामलीला मंचन भोजपुरी भाषेत लिहिण्याचा विचार आला. त्यांनी लगेचच आपल्या मातृभाषेत रामलीला लिहिण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कमी शिकलेले होते तरी देखील त्यांनी संपूर्ण रामायण तोंडपाठ केले. काही काळातच त्यांनी भोजपुरी भाषेत आपले रामलीला मंचन लिहून पूर्ण केले.



इथून घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या भावाच्या मदतीने नाटक मंडळी सुरू केली. याच काळात त्यांनी रामलीला आणि रासलीला या नाटकांचे भोजपुरी भाषेत मंचन लिहिले. काही काळातच त्यांची ही नाटके सर्वदूर प्रसिद्ध झाली. भिखारी ठाकूर यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

प्रत्येक कलाकार हा त्याच्या आसपास घडणाऱ्या घटनांचा वेध घेत असतो. ज्यावेळी भिखारी यांनी आपल्या गावात वाढती लोकसंख्या आणि कृषियोग्य जमिनीचा अभाव या गोष्टींचे निरीक्षण केले त्यावेळी त्यांच्या मनात विद्रोहाने पेट घेतला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

ज्यावेळी ते गावातील सामान्य लोकांना सावकारीमुळे पिचलेल्या अवस्थेत बघायचे, त्यावेळी त्यांच्या मनात करुणा जागृत व्हायची.

शेतकरी मजूर बनून आपली शेती सोडून मोठं मोठ्या शहराकडे वळताना बघून त्यांचे मन दुःखी होत होते. मजूर म्हणून शहरात गेलेले हे शेतकरी तिकडेच स्थायिक व्हायचे, तिकडे लग्न करून घ्यायचे, इकडे त्यांच्या बायका मात्र अत्यंत हालाखीचे आयुष्य जगायच्या.

या सर्वच घटनाक्रमावर भिखारी ठाकूर यांनी बहारा बहार नावाचे नाटक लिहिले. त्यांचे हे नाटक फारच गाजले. १९६३ साली या नाटकावर आधारित बिदेसिया नावाचा चित्रपट देखील तयार करण्यात आला. हा चित्रपट तेव्हा भोजपुरी भाषिकांमध्ये फार गाजला. आजही तो तितकाच लोकप्रिय आहे.

भिखारी ठाकूर यांनी आपल्या लेखणीने भोजपुरी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यांनी लोककल्याणासाठी आपल्या कलेचा वापर केला. त्यांनी आपल्या सबंध आयुष्यात २९ पुस्तकांचे लेखन केले. ते भोजपुरी साहित्य आणि संस्कृतीचे प्रमुख प्रचारक बनले. त्यांच्या नाटकांमधून समाजातील अनेक अंधश्रद्धा व कुप्रथा नष्ट होण्यास मदत झाली.

भिखारी ठाकूर यांची प्रतिभा बघून महापंडित राहुल संस्कृत्यायन यांनी त्यांना ‘भोजपुरी शेक्सपिअर’ ही पदवी दिली होती. भिखारी ठाकूर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. १० जुलै १९७१ साली भोजपुरी साहित्याची ही ज्योत मालवली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

स्कॅम १९९२ मधील ‘स्वामी’चे पात्र ज्याच्यापासून प्रेरित आहे, तो चंद्रास्वामी नेमका कोण होता..?

Next Post

कोण आहेत बर्फाळ प्रदेशात राहणारे एस्किमो ?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

कोण आहेत बर्फाळ प्रदेशात राहणारे एस्किमो ?

काश्मीरच्या खोऱ्यातून देशाला मिळाली आहे पहिली मुस्लिम पायलट

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.