आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आजकल फार चर्चेत असते. बंगालमध्ये होणाऱ्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सुभाषबाबुंचे नाव घेणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी विमान अपघातात सुभाषबाबुंचा मृत्यू झाला नव्हता आणि त्यांचा मृत्यू रशियातील सायबेरियाच्या एका बंदिगृहात झाला असून नेहरूंना याची पूर्वकल्पना होती असे मत व्यक्त केले आहे. नेताजींच्या परिवाराने देखील त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर नेहरूंनी पाळत ठेवल्याचा आरोप केला होता.
नेहरू आणि बोस यांचं नातं सदैव चर्चेत राहिले आहे. या दोघांच्या नात्याने आजवर अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. नेहरू आणि बोस सुरुवातीच्या काळात चांगले मित्र होते. सुभाषबाबू नेहरूंना आपला बंधुतुल्य मित्र मानायचे. पण कालांतराने दोघांच्या नात्यात इतकी मोठी दरी निर्माण झाली की नेहरूंबद्दल लिहिताना बोस म्हणाले, नेहरूं इतके नुकसान त्यांना आजवर कोणीच पोहचवले नाही.
१९३६ मध्ये नेहरू आणि बोस दोघेही युरोपात होते. बोस तिथे निर्वासित म्हणून राहत होते तर नेहरू त्यांची पत्नी कमला यांची आजारपणात जिनेव्हा येथे सेवा करत होते. पुढे कमला यांचे निधन झाले आणि सुभाषबाबू तत्काळ जिनेव्हाला नेहरूंकडे गेले.
सुभाषबाबूंनी नेहरूंच्या पत्नीच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली, नेहरूंच्या पाठीमागे एक भक्कम आधार म्हणून सुभाषबाबू उभे राहिले. यानंतर दोघांमधील मैत्री वृद्धिंगत होत गेली.
नेहरू आणि बोस दोन्हीही समाजवादी विचारांचे होते. पण भविष्यात नेहरू गांधीजींच्या अधिक जवळ गेले तर सुभाषबाबूंनी एकदम विपरीत मार्गाचा अवलंब केला. पुढे दोघांमध्ये संपर्क नाहीसा झाला.
एकेदिवशी सुभाषबाबू यांच्या विमानाचा अपघात झाला. अनेक लोक मानतात की या अपघातात सुभाषबाबूंचा मृत्यू झाला नव्हता. ते यशस्वीरित्या बचावले होते. नेहरूंना सुभाषबाबू जिवंत असण्याची पूर्ण कल्पना होती. ३१ डिसेंबर, १९६१ रोजी खोसला आयोगासमोर श्याम जैन यांनी याची पुष्टी केली होती.
नेहरूंना सुभाषबाबूंबद्दल बरेच रहस्य माहिती होते फक्त त्यांनी कधीच त्याची जाहीर वाच्यता केली नव्हती.
अनुज धर आणि इतर अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकात असा दावा केला आहे की विजयालक्ष्मी पंडित यांनी सोव्हिएत संघाचा दौरा करून आल्यावर १९४८ मध्ये भारतवासियांसाठी एक आनंदाची वार्ता आहे, अशी घोषणा केली होती. पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दबावाखाली त्यांनी त्याबद्दल कुठेच वाच्यता केली नाही. विजयालक्ष्मी पंडित रशियात सुभाषबाबूंना भेटल्या होत्या असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे.
सुभाषबाबूंच्या विमान अपघातानंतर ते जिवंत असल्याचा अनेक कथा प्रचलित आहेत. अनेक लोकांनी त्यांना पाहिले असल्याचे नमूद केले आहे. काही जण म्हणतात की ते रशियात बंदिवासात होते. काही म्हणतात की, तिबेटच्या एका आश्रमात एकनाथलाला म्हणून निवास करत होते.
काही जण म्हणतात की, १९६० ते ७० च्या काळात ते पश्चिम बंगालमधील शारदानंद यांच्या आश्रमात वास्तव्यात होते. काही लोक म्हणतात की सुभाषबाबू हेच स्वामी शारदानंद होते. अनेकांनी त्यांना १९६४ मध्ये नेहरूंच्या अंत्ययात्रेत देखील बघितले असे म्हणतात.
अनेक जण असं मानतात की १९८५ पर्यंत ते फैजाबाद येथे गुमनामी बाबा म्हणून वास्तव्यास होते.
पंडित जवाहरलाल नेहरूंनी १३ मे, १९६२ ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बंधू सुरेशचंद्र बोस यांना पत्र लिहिले होते. या पत्रात नेहरू सुरेशचंद्र बोस यांना म्हणाले होते की, त्यांच्याकडे सुभाषबाबू यांच्या अस्तित्वाबद्दल कुठलाच ठोस पुरावा नाही आहे. पण नेहरूंनी असंख्य गोष्टी लपवल्या आहेत.
नेहरू-बोस दोघेही चांगले मित्र होते. दोघांमधील संबंध जरी बिघडले होते तरी त्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रचंड आदराची भावना होती. महात्मा गांधी यांच्या मनात देखील बोस यांच्याबद्दल आदर होता पण बोस यांच्या कडव्या भूमिका त्यांना मंजूर झाल्या नव्हत्या. बोस यांनी आझाद हिंद सेनेत गांधी-नेहरूंच्या सन्मानार्थ बटालियन देखील सुरु केली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.