The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रस्त्यावर संत्रे विकणाऱ्या एका व्यक्तीने यंदा ‘पद्मश्री’ हा बहुमान मिळवलाय!

by द पोस्टमन टीम
3 March 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

माणसाची ओळख ही त्याच्या कर्मामुळे होत असते, त्याच्याकडे किती पैसा आहे, याला फार मोल नसते. कर्नाटकाचा एक फळ विक्रेता हरेकाला ह्ज्जब्बा हा देखील असाच एक माणूस आहे.

२६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत हरेकाला ह्ज्जब्बा यांचे देखील नाव असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हरेकाला ह्जब्बा हे मूलतः कर्नाटकाचे रहिवासी असून ते संत्रा विकण्याचे काम करतात.



त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांच्या बद्दल लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते, ज्यावेळी त्यांच्या भागातील आयएफएस आधिकरी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियावर हरेकाला यांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला, त्यावेळी लोकांना त्यांच्या कार्याची माहिती मिळाली.

हरेकाला ह्जब्बा हे दक्षिण कन्नडच्या न्यू पडापु गावचे रहिवासी आहे. त्यांचे वय ६८ वर्ष आहे. हरेकाला गेल्या अनेक वर्षांपासून फळविक्रीचा व्यवसाय करत आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

फळविक्रीचा व्यवसाय करत असताना त्यांना पदोपदी आपल्या अशिक्षितपणामुळे येणाऱ्या अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता.

एकदा एक परदेशी पर्यटकांची जोडी त्यांच्या दुकानावर फळ खरेदी करायला आली, पण त्यांना इंग्रजीत फळांची किंमत न सांगता आल्यामुळे हरेकाला त्यांना फळांची विक्री करू शकले नाही.

केवळ अशिक्षित असल्यामुळे त्यांना आपल्या ग्राहकांना परत पाठवावं लागलं ही गोष्ट त्यांच्या फार जिव्हारी लागली.

आपण शिक्षण घेऊ शकलो नाही, आपल्याला ती संधी मिळाली नाही म्हणून काय झालं? आपण आता आपल्या गावतील इतर मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची ह्या उदात्त हेतूने हरेकाला यांना पछाडलं होतं. २००० साली ह्याच उदात्त हेतूला साध्य करण्यासाठी हरेकाला यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी गावात एका प्राथमिक शाळेची सुरुवात केली.

त्यांनी ही प्राथमिक शाळा आधी एका मशिदीमध्ये सुरु करावी लागली. केवळ आपल्या १५० रुपयांच्या कमाईच्या बळावर त्यांनी ती शाळा चालू केली होती.

पुढे जशी विद्यार्थ्याची संख्या वाढायला सुरुवात झाली, नव्या जागेची गरज निर्माण होऊ लागली. मग त्यांनी कर्ज काढलं आणि आपल्या बचतीचा वापर करून शाळेच्या उभारणीच्या कामाला सुरुवात केली. शाळेच्या जागेसाठी त्याने इतर ग्रामस्थांकडून देखील अनेक रुपये उसने घेतले.

शाळेसाठी सरकारी अनुदान मिळावे म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी असंख्य चकरा देखील मारल्या पण त्यांना यश मिळत नव्हतं अखेरीस स्वतच्या बळावर त्यांनी प्राथमिक शाळा सुरु केली.

प्राथमिक शाळेच्या उभारणी नंतर देखील हरेकाला थांबले नाहीत, त्यांनी अजून प्रयत्न करून शाळेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि खूप प्रयत्न केल्यावर अखेरीस ते एक माध्यमिक शाळा २००८ साली सुरू करू शकले.

त्या शाळेत  १० ते १४ वर्षांच्या मुलांना शिकवले जाते. यासाठी देखील त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता.

शाळेच्या उभारणीसाठी हरेकाला यांचा संघर्ष अनुभवत असलेल्या लोकांनी पुढे त्यांच्या कार्याचा प्रसार करायला सुरुवात केली आणि त्यांचा संघर्ष एका कन्नड वृत्तपत्रात छापून आला, त्यांच्या संघर्षाने प्रभावित  तत्कालीन सरकारने त्यांचा शाळेच्या निर्मितीसाठी १ लाख रुपये देण्याची घोषणा केली.

ह्या घोषणेनंतर कन्नड प्रभात नावाच्या एका प्रसिद्ध कानडी दैनिकाने त्यांना  पर्सन ऑफ दि इयर ह्या पुरस्काराने सन्मानित केलं.

पुरस्कारात मिळालेल्या १ लाख रुपयांचा वापर देखील त्यांनी शाळेच्या बांधकामासाठी करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याच पैशातून ह्या गावात बालवाडीपासून ते दहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी शाळा चालू करण्यात आली असून ह्या सर्वांचे श्रेय हरेकाला यांना जाते.

हरेकाला यांच्या कार्याचा गौरव म्हणून २०१२ साली सीएनएन व बीबीसी ह्या दोन आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी त्यांचा गौरव करणाऱ्या माहितीपटांचे प्रसारण केले आणि मग त्यांची ओळख जगाला होऊन, असंख्य लोकांनी त्यांच्या शाळेला देणगी देण्यास सुरुवात केली होती.

लोकांच्या देणगीमुळे शाळेचा अजून विकास होऊन आज एक चांगलं शिक्षण त्या शाळेच्या माध्यमातून देणे हरेकाला यांना शक्य झाले आहे.

लवकरच ह्या शाळेच्या कामात एक अजून मनाचा तुरा रोवला जाणार असून ह्या शाळेच्या परिसरात एक मोठं महाविद्यालय आकारास येत आहे.

आज ह्या फळविक्रेत्याच्या संघर्षाला पद्मश्रीच्या रूपाने मिळणारा सन्मान हा खऱ्या अर्थाने सबंध गावासाठी आणि हरेकाला यांनी उभारलेल्या शाळेच्या विद्यर्थ्यंसाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे.

तुकोबांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे रंजल्या गांजल्या मुलांना आपलंस करणारे हरेकाला हजब्बा खऱ्या अर्थाने त्या गावच्या मुलांसाठी ईश्वराहून कमी नाहीत. त्यांच्या कार्याला आमचा सलाम !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: padmashreePadmashree Awards
ShareTweet
Previous Post

विक्रेत्यांची यशोगाथा ग्राहकापर्यंत पोहोचवणारी, ‘ॲमेझॉन’ची अफलातून मार्केटिंग स्ट्रॅटेजी

Next Post

अस्पृश्यतेविरोधातल्या लढ्यात आंबेडकरांच्या बाजूने उभा राहिलेला राजा : राजर्षी शाहू

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अस्पृश्यतेविरोधातल्या लढ्यात आंबेडकरांच्या बाजूने उभा राहिलेला राजा : राजर्षी शाहू

विमान कंपन्या ग्राहकावर बंदी केव्हा घालू शकतात? जाणून घ्या...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.