The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत-बांगलादेशचा सीमावाद असलेलं हे बेट ग्लोबल वार्मिंगमुळे अखेर समुद्रात बुडालंय

by द पोस्टमन टीम
10 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारत व बांगलादेश यांची मैत्री जुनीच आहे; बांगलादेश निर्मितीत भारताचा मोठा वाटा असला तरी त्या देशाशी संबंध चढउताराचे राहिले आहेत. भारत आणि बांगलादेश दरम्यान बंगालच्या उपसागरात स्थित न्यू मूर बेट पाण्याखाली गेले आहे. या बेटाला भारतात नवीन मूर किंवा पूर्बशा म्हणतात तर बांगलादेशात ते दक्षिण तालपट्टी म्हणून ओळखले जाते. वर्षानुवर्षे दोन्ही देश या बेटावर दावा करत आहेत, पण आता हवामान बदलाने या विषयाला स्थगिती देण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात हवामान आणि पर्यावरणीय बदलामुळे भारत आणि बांगलादेशमधील ३० वर्ष जुना वाद आपोआपच निकालात निघाला आहे.

७० च्या दशकात बंगालच्या उपसागरात वाढलेल्या बेटावर दोन्ही देश आपले हक्क सांगत होते. यावर्षी झालेल्या ताज्या संशोधन अहवालांनुसार, भारतातील पूर्वावंश आणि बांगलादेशातील दक्षिण तलपट्टी या नावाने ओळखले जाणारे साडेतीन चौरस किलोमीटर बेट आता समुद्रात बुडले आहे.

वैज्ञानिक या बेटाला न्यू मूर आयलँड म्हणत. या घटनेमुळे शास्त्रज्ञांमध्ये कमालीची खळबळ उडाली आहे आणि बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दरम्यान शेकडो लहान बेटांच्या भौगोलिक स्थानाच्या भविष्याबद्दल चर्चा तीव्र होऊ लागली आहे.

खरंतर आपत्ती अद्याप आली नाही, परंतु आपल्या सभोवतालची जमीन वेगाने पाण्यात बुडत आहे. बंगालच्या उपसागरातील बेटे समुद्राचा भाग बनत आहेत. वस्तुतः बंगालच्या उपसागरातील समुद्र दरवर्षी ३.३ फूट दराने वाढत आहे आणि त्याचे कारण ‘ग्लोबल वार्मिंग’ आहे.



शास्त्रज्ञांना भीती होती आणि २०२० पर्यंत हे सुरू राहिल्याने १४ बेटांचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. या बेटांवर राहणाऱ्या ७० हजाराहून अधिक लोकसंख्येला स्थलांतरित करावे लागले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने असा अंदाज लावला आहे की बांगलादेशच्या बाजूने वाढत्या समुद्रांमुळे २०५० पर्यंत २ करोड लोक विस्थापित होतील.

पश्चिम बंगालजवळील न्यू मूर बेटच नाही तर लोहचरा, बेडफोर्ड, कबसगडी आणि सुप्रीभंगा नावाची बेटेही पाण्यात बुडाली आहेत. एकदा या बेटांवर राहणारी ६००० हून अधिक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. प्रसिद्ध घोरमारा बेटाने ९० टक्के जमीन म्हणजेच ९६०० एकर जमीन व्यापून टाकली आहे. अशी भीती व्यक्त केली जात आहे की येत्या २५-३० वर्षात १३ मोठ्या बेटांचे अस्तित्व मोठ्या धोक्यात येईल.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

प्रथम न्यू मूर आयलँडबद्दल अधिक जाणून घेऊया.

हे लहान बेट १९७४ मध्ये शोधले गेले होते, जेव्हा वैज्ञानिक काही उपग्रह प्रतिमांचा अभ्यास करीत होते. ८०च्या दशकाच्या सुरूवातीस, भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी या बेटावर दावा केला. कारण, बंगालच्या दक्षिण २४ परगना आणि बांगलादेशातील सातखीराच्या मध्यभागी हे बेट वाढले होते.

एका बाजूला बंगालच्या उपसागराचा समुद्र आणि दुसरीकडे बांगलादेशच्या हरियाभंगा नदीचा उगम येथे होतो. १९८१ मध्ये भारताने तेथे राष्ट्रीय ध्वज उभारून सीमा सुरक्षा दलाची एक चौकी स्थापन केली आणि नौदलानेही गस्त घालण्यास सुरवात केली.

१९८७ नंतर बेट खोळंबायला सुरुवात झाली. पुढे २००० सालापर्यंत हे बेट निर्जन बनले होते. बीएसएफनेसुद्धा हे स्थान त्यानंतर रिक्त केले होते. परंतु नौदलाची गस्त अजूनही सुरू आहे. सन २००० च्या शेवटी शास्त्रज्ञांनी ते बेट अस्तित्त्वात नाही सांगितले. जाधवपूर युनिव्हर्सिटीच्या ओशनोग्राफी विभाग आणि इस्रोच्या संयुक्त संशोधनानेही हे बेट समुद्रात बुडल्याचे सिद्ध केले आहे. १९९० मध्ये हे बेट समुद्रसपाटीपासून फक्त तीन मीटर उंच होते.

न्यू मूर बेटापूर्वी १९९६ मध्ये लोहचारा बेट बुडाले. हे बुडलेले बेट डिसेंबर २००६ पर्यंतदेखील दृश्यमान होते. मग इथल्या पाण्याची खोली दोन-तीन मीटरपर्यंत पोहोचली होती. या बेटाचे अस्तित्व संपल्याबद्दलचा शोक जगभर साजरा करण्यात आला.

२००७ च्या ऑस्कर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ट्रॉफीसह लोहाचराचे मॉडेलदेखील देण्यात आले होते आणि ग्लोबल वॉर्मिंगचा बळी ठरलेले जगातील पहिले बेट अशी बातमी संपूर्ण जगभर प्रसारित झाली होती.

तथापि, जाधवपूरच्या समुद्रशास्त्र विभागाचे संशोधक तुहिं घोष म्हणतात की दोन वर्षांनंतर २००९ मध्ये हे बेट पुन्हा दिसले होते, परंतु थोड्या काळासाठी. घोरमारा नंतर, अंक मौसूनी बेटातूनही काही लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आपण ग्लोबल वार्मिंगबद्दल चर्चा करतो त्यावर काही ठोस उपाययोजना करावे यावरही चरचा होते परंतु ज्या बेटांचे अस्तित्व संपलेले आहे किंवा हळूहळू काही बेटांवर जीवनासाठी लढाई करणे कठीण झाले आहे त्यापासून आपण लपू शकत नाही.

खरंतर या बेटावर कोणतीही लोकसंख्या नव्हती, म्हणून कोणत्याही प्रकारचे विस्थापन झाले नाही. पण दोन्ही देश या बेटावर आपला दावा करत असतांना ग्लोबल वॉर्मिंगमुळे या बेटाचे अस्तित्व नष्ट झाले आणि त्यामुळे दोन्ही देशांनी हा मुद्दा कायमचा बंद केला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जतीन परांजपेंनी विराट कोहलीला नायकीचा पहिला कॉन्ट्रॅक्ट ऑफर केला होता

Next Post

भारताची स्विस बँक असलेली ‘स्टेट बँक ऑफ सिक्कीम’ अखेर RBIच्या नियमाखाली आली आहे

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

भारताची स्विस बँक असलेली 'स्टेट बँक ऑफ सिक्कीम' अखेर RBIच्या नियमाखाली आली आहे

या कंपनीने आईस्क्रीमची किंमत वाढवावी लागली म्हणून जाहिरात करून माफी मागितली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.