The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हि*टल*रने आर्य वंशाचं मूळ शोधण्यासाठी तिबेटला संशोधकांची एक टीम पाठवली होती

by Heramb
28 September 2024
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘जम्बुद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की, यह जन्मभूमी है परमपूज्य श्रीराम की..’ रामायणातील लव-कुश यांनी गायलेल्या गाण्याचे हे बोल तर आपल्याला आठवतच असतील. यामधील ‘आर्यावर्त’ हा शब्द प्रामुख्याने उत्तर भारतीय द्वीपखंडासाठी वापरलेला असावा. ‘आर्यावर्त’चा मूळ संस्कृतमधील अर्थ म्हणजे ‘आर्यांचे निवासस्थान’.

आर्यांच्या आक्र*मणांचा सिद्धांत हा केवळ या देशात फूट पाडण्यासाठी मांडला गेला आहे हे वेळोवेळी सिद्ध होतच आलं आहे. त्याप्रमाणेच केवळ धर्माच्या आधारावर बाह्य शत्रूंवरील, त्यांच्या जुलमी आक्र*मणांवरील इतिहासाच्या अभ्यास आणि अध्ययनाचं लक्ष हटवण्यासाठी असे प्रयत्न वेळोवेळी या देशात झाले.

सुमारे शंभर वर्षांपूर्वी हे एक सार्वभौम राज्य होते आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर होती. हि*टल*रने मूळ आर्यांचा शोध घेण्यासाठी तिबेटला एक मोहीम पाठवली होती. या टीमने तिथे बरेच कामही केले. दुसऱ्या महायु*द्धाचा या मोहिमेवर मोठा परिणाम झाला. दुसऱ्या महायु*द्धादरम्यान जर्मनीचा हुकूमशहा हि*टल*रचे आर्यांविषयीचे प्रेम सर्वश्रुत आहे.

हि*टल*र त्याच्या ना*झीवादात जगातील आर्यांच्या वर्चस्वाबद्दल बोलतो इतकेच काय तर स्वस्तिक देखील ना*झीचे प्रतीक म्हणून स्वीकारले जाते. स्वस्तिक हे आर्यांचे पवित्र धार्मिक चिन्ह मानले जाते. एवढेच नव्हे तर हि*टल*रने महायु*द्धापूर्वी ना*झींची एक टीम तिबेटला पाठवली होती, ज्यांचा उद्देश आर्य वंशाचे मूळ शोधणे हा होता.

१९३८ साली ना*झी पक्षाचे प्रमुख सदस्य हेनरिक हिमलर यांनी तिबेटमध्ये ५ सदस्यीय टीम पाठवली. बीबीसीच्या अहवालानुसार ही मोहीम भारताच्या माध्यमातून सुरू झाली. हि*टल*रचा असा विश्वास होता की काही मूळ आर्य अजूनही तिबेटमध्ये आढळू शकतात.



भटक्या आर्यांनी १५०० वर्षांपूर्वी उत्तरेकडून भारतात प्रवेश केला होता आणि या आर्यांनी स्थानिक गैर-आर्यांशी अनुवांशिकरित्या ‘मिसळण्याचा’ गुन्हा केला होता. म्हणूनच त्यांना पृथ्वीवरील इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ बनविणारी वैशिष्ट्ये गमवावी लागली, असा हि*टल*रचा समज होता. गौर वर्णाचे भटके लोक अटलांटियन्स नावाच्या गमावलेल्या एका काल्पनिक शहरात राहतात, तोच एक श्रेष्ठ वंश आहे आणि त्यांचे रक्त शुद्ध आहे अशी त्याची धारणा होती.

हे पौराणिक बेट इंग्लंड आणि पोर्तुगाल दरम्यान अटलांटिक महासागरात कुठेतरी स्थित आहे असे मानले जाते. हे बेट विजेच्या पडण्याने बुडाले होते असाही समज होता. या घटनेनंतर वाचलेले सर्व आर्य इतर सुरक्षित ठिकाणी गेले. यासाठी हिमालयीन प्रदेश हा सुरक्षित ठिकाण मानला जातो. विशेषतः तिबेटला जगाचे छप्पर म्हटले जाते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

१९३५ साली हिमलरने ना*झी संघटनेच्या अंतर्गत आयनेर्बे ही वडिलोपार्जित वारसाची स्थापना केली. त्याचा उद्देश अटलांटिसच्या लोकांचा शोध घेणे हा होता. हे लोक वीज कोसळल्यानंतर कुठेतरी गेले होते. १९३८ साली हिमलर संघाचे दोन महत्त्वाचे सदस्य ५ जर्मन लोकांच्या या शोध मोहिमेवर तिबेटला पाठवले गेले. यात एक २८ वर्षीय अर्नेस्ट शेफर होता. तो दोन वेळा भारत-चीन-तिबेट सीमेवर गेला होता, आणि दुसरा होता मानववंशशास्त्रज्ञ ब्रूनो बेगर, याला कवटी आणि चेहऱ्यांविषयी तपशीलवार माहिती मिळवायची होती. हे दोघेही या टीमचे महत्वाचे सदस्य होते.

या टीमला घेऊन जाणारे जर्मन जहाज श्रीलंकेतील कोलंबोला पोहोचले, तेथून ते मद्रास आणि नंतर कलकत्ता येथे पोहोचले, सुरुवातीला ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना जर्मन हेर समजले आणि त्यांना भारतातून जाऊ दिले नाही. सिक्कीम राज्यानेही त्यांच्यावर संशय घेतला, पण अखेरीस ही टीम कशीबशी तिबेटला पोहोचली. १९३३ साली १३१व्या दलाई लामांचा मृत्यू झाल्यानंतर तिबेटवर त्याच्या संरक्षकाचे राज्य होते.

तिबेटमधील सरकार आणि लोकांनी या पक्षाचे खुलेआम स्वागत केले. मानववंशशास्त्रज्ञ बेगरने स्वतःला डॉक्टर घोषित केले होते. बौद्ध धर्मामुळे आर्य कमकुवत झाले हे नाझींचे मत होते पण हे त्या बौद्ध तिबेटींना माहित नव्हते. ऑगस्ट १९३९ मध्ये जेव्हा पहिले महायु*द्ध होणे निश्चित होते तेव्हा शेफर आणि त्याचे साथीदार त्यांच्या प्रत्यक्ष संशोधनात अधिक वेळ घालवण्याआधीच त्यांची मोहीम थांबवण्यात आली.

बेगरने तोपर्यंत ३७६ तिबेटी लोकांच्या डोक्याचे आणि इतर मोजमापांचे दोन हजार फोटो काढले होते. या सगळ्यामध्ये ३५० हात आणि बोटांचे ठसे घेण्यात आले. त्याने दोन हजार मानवशास्त्रीय कलाकृती गोळा केल्या होत्या. एकूण ४० हजार छायाचित्रे या मोहिमेदरम्यान घेण्यात आली.

यु*द्ध संपताना हिमलरने या संघाची पुन्हा तिबेटला येण्याची व्यवस्था केली. हा तिबेटी खजिना साल्झबर्गच्या किल्ल्यावर पोहोचला आणि यु*द्धादरम्यान तिथेच राहिला. मित्र राष्ट्रांनी १९४५ साली राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा अनेक तिबेटी छायाचित्रे आणि इतर साहित्य नष्ट झाले. मोहिमेत केलेल्या प्रयोगांच्या डॉक्युमेंटेशनबरोबरही हेच घडले आणि अशा प्रकारे ही शोधमोहीम शेवटपर्यंत पोहोचू शकली नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या देशाचा राजपरिवार उदरनिर्वाहासाठी मासे विकतो आणि हॉटेल चालवतो

Next Post

‘टायटॅनिक’सह विसाव्या शतकातील तीन मोठ्या सागरी अपघातांतून वाचलेली ‘व्हायलेट’

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

'टायटॅनिक'सह विसाव्या शतकातील तीन मोठ्या सागरी अपघातांतून वाचलेली 'व्हायलेट'

अमेरिकन सैन्याची फेव्हरेट असलेली एम-१६ राय*फल एवढी विशेष का आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.