आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोनाव्हायरस लॉकडाऊनचा भारतातील कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे .देशव्यापी लॉकडाउनने आर्थिक यंत्रणेला प्रचंड वेढले आहे. कृषी क्षेत्राला कामगार आणि कृषीपूरक वस्तूंच्या अनुपलब्धतेची बरीच समस्या भेडसावत आहे. लॉकडाऊन निर्देशामधून शेतीमालाला अत्यावश्यक वस्तू म्हणून सूट देण्यात आली असतानाही शासकीय यंत्रणा आणि अटी या कृषीक्षेत्रासाठी बरीच समस्या निर्माण करीत आहेत.
लॉकडाऊनमुळे दुहेरी समस्या
अस्मानी संकट आणि अवेळी पावसामुळे त्रस्त असलेल्या भारतीय कृषी क्षेत्राला कोरोनाव्हायरसच्या अडथळ्यामुळे आणखी एक मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामाचा हंगाम जवळ येताच, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची चिंता आहे .नुकत्याच झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे गहू, मोहरी आणि डाळीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार आधीच केली आहे परंतु येणाऱ्या हंगामासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि बाजाराची अनिश्चितता यामुळे शेतकर्यांनी आपले पीक निश्चित करता येत नाहीये
मजुरांची होणारी फरपट आणि पलायन
लॉकडाऊन दरम्यान वस्तूंच्या वाहतुकीवरील निर्बंध कायम असल्याने शेतकर्यांना त्यांच्या उत्पन्नातील चिंता वाढण्याची तर शक्यता आहेच परंतु मजुरांची भविष्यातील होणारी अनुपलब्धता हा मोठा समस्येचा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहणार आहे . मजुरांच्या कमतरतेमुळे शेतात बटाटे कापणीचे अहवालही सरकारला प्राप्त झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे कृषी विपणनाचे मुख्य सल्लागार प्रदीपकुमार मजूमदार यांनी सांगितले की,
कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे बिहार आणि झारखंडमधील बहुतेक कामगार आपल्या गावी परत आले आहेत .शिवाय, बियाणे, खते व इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे कोणतेही दुकान नसल्यामुळे उन्हाळी हंगामाच्या पिकाची पेरणी होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
शेतमाल पुरवठा साखळी विस्कळीत
कोम्बाईन आणि हार्वेस्टर्स यासारख्या शेतातील अनेक मशीन्स महामार्गावर अडकून पडली आहेत कारण ते चालविण्यास कोणीही नाही त्यामुळे शेतमाल काढणीचा दूरगामी परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो . कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे कृषी मालाच्या पुरवठा साखळीवर प्रचंड परिणाम झाला आहे. कृषी उत्पादनांचे काढणी नंतरची खराब होण्याची संभावना वाढली आहे . तसेच, लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला आहे. अनेक कोल्ड स्टोरेज आणि गोदाम मालकांनी मजुरांच्या टंचाईबद्दल तक्रार केली. पोलिसांच्या मारहाणीच्या भीतीने काम करण्यास तयार नसलेले बरेच कामगार मजूर घरी राहत आहेत किंवा आपल्या गावी चालत निघत आहेत.
स्थानिक पातळीवर शेतकरी वर्गासाठी मार्गदर्शक तत्त्वे
केअर रेटिंग्जचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, उत्पादनापेक्षा वितरण वाहिनीतील बिघाड अधिक स्पष्ट आहे. म्हणूनच, स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर सरकारने पारदर्शक मार्गदर्शक सूचना पाळल्या पाहिजेत. तसेच, लॉकडाऊनमुळे मजूर खेड्यापाड्यात जात असल्याने ग्रामीण बेरोजगारीच्या पातळीत अचानक वाढ होऊ शकते. पुढे, पोल्ट्री, मत्स्यपालन आणि म्हशींच्या मांस क्षेत्राला अनेक अफवांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे . कोविड – १९ आणि मांसाच्या वापराविषयी अफवा पसरविण्यामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योजक धुळीला मिळायची उदाहरणे समोर येत आहेत
कृषी क्षेत्रातील भविष्याचं काय ?
प्रगतशील तरकारी उत्पादक शेतकरी दौलत साठे म्हणाले की ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या समस्येवर सरकारने बाजारसमित्या बंद केल्यावर शहरातील महागाईच्या दराने शहरातील व्यापारी वर्ग पुन्हा फायद्यात आला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाची पडत्या दरात शेतमाल खरेदी होत आहे त्यासाठी सरकारने प्रभावी शेतमाल खरेदीची प्रक्रियेची योजना राबवली पाहिजे नाहीतर महागाईचा दर अनेक पटीने वाढेल.
अनेक भागात भविष्यातील हंगामात लागवड करवायाची मानसिकता शेतकऱ्याची नाही याचे दूरगामी परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहेत यात शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.