आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या आणि आयुष्यभर अहिं*सेचे व्रत पाळणाऱ्या महात्म्याचा हिं*सेनेच दुर्दैवी अंत झाला. यावर आपण आजवर बरेच ज्वलंत वादविवाद ऐकले असतील.
महात्माजींचे वैचारिक आणि राजकीय शत्रू असलेले मोहम्मद अली जिन्ना यांची गांधी ह*त्येवर प्रतिक्रिया काय होती याबद्दल बऱ्याच मनांमध्ये कुतूहल असते.
बापूजींची ह*त्या झाल्यानंतर केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही अतिशय शोकाकुल वातावरण होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीस आजन्म विरोध केलेल्या बापूंना पाकिस्तानच्या संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली होती.
पाकिस्तानचे संस्थापक असलेले जिन्ना यावेळी म्हणाले,
“गांधीजींवर जीवघेणा ह*ल्ला झाला याचा मला प्रचंड धक्का बसला आहे. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी ते हिंदू समाजातील एक महान व्यक्ती होते. संपूर्ण जगातच एक सन्मानित नेता म्हणजे महात्मा गांधी. भारतातील समाज व गांधी परिवार यांच्या दुःखात मी सहभागी आहे. गांधीजींसारख्या महान व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अतिशय कठीण काम आहे . “
जिन्ना यांनी पूर्वग्रह बाजूला ठेऊन श्रद्धांजली वाहिली असली तरीही त्यांनी व्यक्त केलेल्या उद्गारातील वाक्यरचना, जाणीवपूर्वक व हुशारीने मांडली गेली असल्याची टीका त्यांच्यावर होते. गांधीजींचे संपूर्ण जीवन सांप्रदायिक सद्भावनेला वाहिलेले असताना देखील जिन्नांनी श्रद्धांजली वाहताना ‘हिंदू’ समाजाचा केलेला उल्लेख बोचणारा ठरतो .
एकीकडे पाकिस्तानचा संस्थापक गांधीजींचा उल्लेख ‘हिंदू समाजाचा नेता’ असा करीत असताना हिंदुबहुल असलेल्या भारतात मात्र गांधीजींवर मुस्लिमप्रिय नेता असे आरोप होत होते. केवढा हा विरोधाभास!
गांधीजींनी त्यांची ह*त्या होण्यापूर्वी काही दिवस आधीच पाकिस्तानचा दौरा करण्याची योजना आखली होती, त्यास जिन्नांचा देखील पाठिंबा होता. गांधीजींचा तो दौरा झाला असता तर कुणास ठाऊक भारत-पाकिस्तान संबंध आज वेगळे राहिले असते. पण इतिहासात ‘जर-तर’ला कुठे किंमत असते.
पाकिस्तान संसदेत ४ फेब्रुवारी १९४८ रोजी भरलेल्या अधिवेशनात गांधीजींना श्रद्धांजली देण्यात आली तेव्हा, लिकायात अली खान यांनी पुढील उद्गार काढले,
“महात्मा गांधींच्या ह*त्येबद्दल बोलण्यासाठी मला आज उभे राहावे लागते आहे याचे मला प्रचंड दुःख आहे. गांधीजी आजवरच्या सर्वांत महान नेत्यांपैकी एक होते. त्यांनी गेली २० वर्षे भारतीय राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. काँग्रेस पक्ष आज गांधीजींच्या प्रयत्नांच्या जोरावर उभा आहे यात काहीही शंका नाही. मी अशी प्रार्थना करतो की महात्माजींच्या जीवनकाळात भारतीय उपखंडातील विविध संप्रदायात जी एकी आणणे शक्य झाले नाही ती निदान त्यांच्या निधनानंतर तरी आणता यावी.”
ज्या महात्म्याने आयुष्यभर अहिं*सेचा मार्ग स्वीकारला त्याला अशा पद्धतीने मृत्यू आला याहून मोठे दुर्दैव ते काय! त्या महात्म्याच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.