आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
बर्गर किंगचं नाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. गेल्या वर्षी त्यांनी एक जाहिरात केली होती ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या जाहिरातीत त्यांनी दाखवलं होतं की गायींना गवती चहाचे पानं खायला घातली पाहिजेत जेणेकरून त्यांच्यामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेन आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेसचं प्रमाण कमी होईल.
cow farts & burps are no laughing matter. they release methane, contributing to climate change. that’s why we’re working to change our cows’ diet by adding lemongrass to reduce their emissions by approximately 33%. learn about our ongoing study: https://t.co/kPCXpjfbGL #CowsMenu pic.twitter.com/DnmF8gVVL0
— Burger King (@BurgerKing) July 14, 2020
आता प्रश्न हा उपस्थित राहतो की गायींमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात विषारी वायू उत्सर्जित होतात का? काही संशोधनानुसार गायींची पचनक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मिथेन आणि तत्सम विषारी वायू उत्सर्जित होतात. खरं काय आहे ते जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून.
नासा या संस्थेच्या एका संशोधनानुसार एका गायीच्या ढेकर देण्यामुळे वर्षभरात जवळपास ८० ते १२० किलो मिथेन वायू उत्सर्जित होतो. हा आकडा एखादी कार वर्षभरात जेवढा कार्बन उत्सर्जित करते तितकाच आहे. पण फक्त गायच नाही तरत इतर पाळीव प्राण्यांमुळेदेखील विषारी वायूंचे प्रमाण वाढते आहे.
असं म्हणतात की जगातील एकूण विषारी वायूंचं प्रमाण काढलं तर त्यातील १४% वायू केवळ गाय, बकरी, डुक्कर, शेळी यांच्यामुळेच उत्सर्जित होतो.
सगळीच जनावरं आपल्या पचनक्रियेसाठी आतड्यात असलेल्या बॅक्टेरियाची मदत घेतात. जेव्हा एखादा पदार्थ पचायला जड असतो तेव्हा हे बॅक्टेरिया व्हिटामिन K आणि B ययांमध्ये बदलतात. याच प्रक्रियेमध्ये हे बॅक्टेरिया काही वायू निर्माण करतात. हाच तो मिथेन गॅस.
पण, मग प्रश्न असा येतो की जर सगळीच जनावरं ही प्रक्रिया करतात तर गायींनाच जास्तं ढेकर का येते?
तर गायींच्या आतड्यांत एक बॅक्टेरिया असतो जो यासाठी कारणीभूत ठरतो. ‘रुमेन’ नावाचा हा बॅक्टेरिया बिना प्राणवायूचाही राहू शकतो. गायींच्या आतड्याच्या बाहेर हा आढळून येतो. आता जेव्हा गायी चारा खातात तेव्हा त्याला सडवून (फरमेंट करून) त्यातून त्याला हवं ते पोषण घेऊन तो जिवंत राहतो. फरमेंट केल्यामुळे जास्तं वायू निर्माण होतात. त्यांना बाहेर काढाणं गरजेचं असतं. यामुळेच गायींना जास्तं ढेकर येतात, असं काही स्टडीज सांगतात.
हे प्रमाण कमी कसं करता येईल यासाठी संशोधनं सुरु आहेतच. एका संशोधनानुसार गायीच्या जेवणात जर आपण शेवाळ मिसळलं तर हे प्रमाण ३०% कमी होईल.
याच कारणासाठी बर्गर किंगने पण जाहिरात केली होती. त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या इथल्या गायींना गवतीचहा खाऊ घालतो ज्यामुळे या विषारी वायूंचं उत्सर्जन ३३% एवढं कमी झालंय. भारत सोडून इतर देशांत गायीचं मांस मिळतं हे तर आपल्याला माहितीच आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे गेल्यावर्षीपासून जगभरातच लोकांचं मांसाहार करणं कमी झालंय अशातच बर्गर किंगच्या या जाहिरातीने सगळीकडे धुमाकूळ घातला होता.
आता, फक्त गायींमधूनच हे वायू उत्सर्जित होतात का?
नाही!
ज्या प्राण्यांच्या पोटात पचनक्रियेसाठी चार चेंबर्स असतात त्या सगळ्याच पाळीव प्राण्यांच्या पचनक्रियेतून हे विषारी वायू उत्सर्जित होतात. UNच्या फूड ऍंड ऍग्रीकल्चरल ऑर्गनायझेशननुसार गायींव्यतिरिक्त मेंढ्या, बकऱ्या आणि डुक्करसुद्धा मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जित करतात. यात गायींचं प्रमाण जास्तं आहे.
एक गाय रोजच्या जेवणातून ३०० ते ५०० लिटर वायू उत्सर्जित करते. याचं प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ करतायत. त्यांच्या आहारात बदल करून किंवा त्यांना इंजेक्शन देऊन हे प्रमाण कमी करता येते पण, काही शास्त्रज्ञांच्या मते त्यांना मारण्याच्या नादात गायींच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
आता यावर पुढे काय उपाययोजना निघेल हे तर येणारा काळच ठरवेल!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.