आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
मोहरम या इस्लामी कॅलेंडरच्या महिन्याची प्रत्येक दहावी तारीख ही ‘यौम ए आशुरा’ म्हणून ओळखली जाते. याच दिवशी कारबालाच्या यु*द्धात इमाम हुसेन आणि त्यांचे साथीदार शहिद झाले होते. हुसेन यांना न्याय आणि मानवतेचे प्रतीक मानले जाते. इ.स. सन ६८० मध्ये हे यु*द्ध झाले होते. दरवर्षी मोहरमच्या दिवशी मोहम्मद पैगंबरांचे नातू इमाम हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येते. ताजियांसमवेत मोठा जुलूस काढला जातो व या यु*द्धातील शहिदांच्या स्मृतींना वंदन करण्यात येते.
इस्लामचा उगम ज्या मदिना शहरातून झाला, तिथून काही अंतरावरच मुआविया नावाचा हुकूमशहा राज्य करत होता. मुआवियाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा याजिद सिंहसनावर येऊन बसला. याने स्वतःला खलिफा घोषित केले. त्या काळात बादशहा याजिद यांचा इतका दरारा होता की लोक त्यांच्या नावानेच थरथर कापायचे. त्याच्या शहरातील जनतेत मात्र हुसेनच्या नावाचा बोलबाला होता.
याजिद इस्लामला स्वतःचा तत्वांवर चालवू इच्छित होता. याजिदने इमाम हुसेनला आपल्या अस्तित्वाला मान्यता देण्याची आज्ञा दिली. यासाठी त्याने प्रचंड जोर-जबरदस्ती देखील केली. परंतु इमाम हुसेन कुठल्याच दबावाला बळी पडले नाही.
ज्यावेळी हुसेन यांनी याजिदच्या अस्तित्वाला व प्रभुत्वाला मान्यता देण्यास नकार दिला, त्यावेळी हुसेन यांना रोखण्यासाठी याजिदने योजना आखायला सुरुवात केली. इ.स.६८० मध्ये हा घटनाक्रम घडत होता. इमाम हुसेन आपले घरदार सोडून मक्का शहरात पोहचले. त्यांना जेव्हा शत्रू त्यांना मारणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा ते शहर कुफेच्या दिशेने निघाले, त्यावेळी त्यांच्या समवेत लष्कर देखील होते. यात बायका मुलांसह एकूण ७२ लोक सहभागी होते.
याजिदच्या सैन्याने हुसेनवर ह*ल्ला चढवला. मोहरमच्या दिवशी १० तारखेला सकाळच्या नमाजाच्या वेळी यु*द्धाला सुरुवात झाली. एकीकडे याजिदचे सैन्य होते, तर दुसरीकडे हुसेन यांच्या समवेत ७२ परिवार होते. याजिद शक्तिशाली होता, त्याच्या सैन्याकडे ह*त्यारं, खंजीर आणि तलवार यांच्यासारखी शस्त्रे होती, मोठी फौज होती.
महिला व बालकांसह ७२ लोकांचे सैन्य घेऊन इमाम हुसेन याजिदचा सामना करणार होते. यु*द्ध सुरू झाले याजिदच्या सैन्याशी इमाम हुसेन व त्यांचा ७२ साथीदारांनी निकराचा लढा दिला.
अखेरीस इमाम हुसेन यांच्यासह त्यांचे ७२ साथीदार शहीद झाले. त्यांच्या शौर्यामुळेच आज ‘इस्लाम जिंदा होता है हर कर्बला के बाद’ असे म्हटले जाते.
शत्रूंनी इमाम हुसेन यांच्या सहा महिन्यांच्या अली अजगर नावाच्या बाळाचा शि*रच्छे*द केला. १८ वर्षांच्या अली अकबरची निर्ममपणे ह*त्या केली. १३ वर्षांच्या कासिम या मुलाला वेगाने पळणाऱ्या घोड्यांच्या टाचेखाली फेकले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. सात-आठ वर्षांच्या मोहम्मदाचा शि*रच्छे*द केला.
याजिद यांच्या सैन्याने इमाम हुसेन व इतर ७२ लोकांची मोहरमच्या १० व्या तारखेला ह*त्या केली म्हणून हा दिवस पवित्र मानला जातो. याजिदने केवळ ह*त्याच केल्या नाहीत तर हुसेन समर्थकांच्या घरं दारं संपत्तीला जाळून खाक केले.
मोहमरच्या दहाव्या दिवशी इमाम हुसेन शहीद झाले म्हणून हा दिवस आशुरा म्हणून ओळखला जातो. आशुराच्या दिवशी आपले दुःख प्रकट करण्यासाठी मुस्लिम समाज ताजिया यात्रा काढतो. काही वेळा या सणात ‘गैर मुसलमान’ देखील सहभागी होतात. लोक या यात्रेत एक स्वरात ‘या हुसेन’ म्हणून इमाम हुसेन यांना श्रद्धांजली वाहतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.